Sunday, August 28, 2011

सेंटर हिल लेक ची रात्र ...

शेवटी मागच्या आठवड्या मध्ये मास्टर्स चा डिफेन्स झाला आणि आयुष्य परत ब्लोग्गिंग च्या रुळावर आले...थोड्या पार्ट्या आणि नंतर चा आराम (त्याला इंग्लिश मध्ये hangover म्हणतात !) झाल्या वर आज लिहायला बसलो...(तसा मागचा महिना thesis लिहून लिहून डोक्याची मंडई झाली होती !)

दीड महिन्यापूर्वी कुक्वील च्या जवळच्या एका सरोवारची रात्र सहल झाली होती....आमच्या मधले सगळे फोटोग्राफर वीर त्या center hill lake ला हजर होते...गौतम च्या नवीन कॅमेराचे उद्घाटन पण करायचे होते... तसा हा center hill lake एका धरणामुळे तयार झाला आहे...त्याचे ६५ मैल नुसते पाणी म्हणजे वेड लागायची पाळी...!

संध्याकळी पोचलो तिकडे... "संधी प्रकाश" काय मस्त नाव आहे ना ..फोटो काढण्यासाठी निसर्गाने दिलेली अप्रतिम "संधी"...!


माझे न्यूयॉर्क-कालीफोर्नियाचे मित्र त्यांच्या इकडच्या Hummer-Ferrari च्या गोष्टी मला सांगतात...पण हा फोर्ड चा जुना ट्रक मला जास्त भावतो... असे ट्रक आणि ते चालवणारे कंट्री आजोबा यांचे एक गुढ नाते असते ते नव्या गाड्यामध्ये मला कधी दिसले नाही..


अंतरंगात घेऊन जाणारा आणि खोलीचा अंदाज न देणारा हा पूल...एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या मनासारखा...!


हा माझा मित्र गुगल उर्फ श्रीसागर ...फोटोग्राफी चा माझ्या सारखा वेडा...आमच्या वेड्यांचे स्वतःचे फोटो कोणीच काढत नाही..
आणि कोणाला हौस पण नसते...पण कधीतरी फेसबुक च्या भुकेसाठी आम्ही असे एखाददुसरे स्वतःचे अजरामर फोटो काढतो... ;)


रात्र झाली आणि मग आमचे चालू झाले फोटोग्राफीचे प्रयोग (तिकडे पण संशोधन तिच्या मायला !) कॅमेरा tripod वर लावला...गुगल चा SLR असल्याने अमर्यादित शटर स्पीड मिळाला... Motorola Attrix mobile फोनचा उपयोग torch सारखा केला आणि विविध आकार तयार केले....खूप कष्टामधून एक पद्धत सापडली आणि मग फुल धमाल !

हा मीच आहे...इंजिनियर फक्त डोक्याने विचार न करता मनाने पण विचार करतात...आणि जेंव्हा करतात तेंव्हा त्याचा परिणाम खालचा फोटो असतो...


हा गौतम माझा प्रोफेसर मित्र....Mathematics Modeling मध्ये खेळणारा ...त्याला आम्ही आमच्या केमिकल संयुगामध्ये कैद केले....


गणपती कुमार ...खूप विचारी आणि अवकाश संशोधन हा त्याच्या छंद !


The Batman ..गुगल उर्फ श्रीसागर ....कुठली पण गोष्ट विचारा आणि कधी पण विचारा २ सेकंदामध्ये उत्तर मिळते अशी त्याची ख्याती...

मी, श्रीराम आणि गुगल...आमच्या युनिवर्सिटी वर जीवापाड प्रेम करणारी लोक....Tennessee Tech University ला (TTU) ला शेवटी आम्ही आमच्या डोक्यावर बसवले...


(हे शेवटचे long exposure चे फोटो श्रीसागर,गणपती,मी,गौतम,श्रीराम आणि पद्मनाभनकुमार यांनी मिळून काढले आहेत .)












Sunday, June 12, 2011

जीवाची मुंबई ...उन्हाळ्यात ती पण माझ्या कॅमेरात !

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे..."जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा" असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते फोटोच शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर !)पण अशी शांतपणे मुंबई ती फिरणे झाले नव्हते ...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत किती साली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (अजूनही मला फोटो बघताना तिचा आवाज ऐकू येतो....;))


दक्षिण मुंबई मध्ये रस्त्यवरून फिरताना अनेक जुन्या इमारती लक्ष वेधून घेत होत्या....मी तर किती तर वेळ वेडा होऊन बघतच बसलो होतो....प्रत्येक इमारतीचा एक इतिहास होता तरीसुद्धा त्या वर्तमानाला तोंड देत उभ्या होत्या....अगदी जुन्या पारशी बाबा सारख्या,...



मधेच ही १०० कोटी ची इमारत दिसली....एकदा माझ्या एका अमेरिकन मित्राला मी त्याबद्दल सांगत होतो (तेंव्हा मला त्या इमारतीचा फुल अभिमान वगैरे वाटत होता !)तो म्हणाला "असेल १०० कोटीची पण याचा तुमच्या देशातील सामान्य लोकांना उपयोग काय..?" माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते...



या किल्ल्यावाल्याकडे बघून मला एक नेहमी प्रश्न पडतो कि "हे कुठली पण किल्ली बनवू शकतात मग चोरीचे-घरफोडीचे विचार करत असतील का ?" पण बहुतेक त्यांनी पण स्पायडरमॅनचे बोलणे ऐकले असणार "great power comes with great responsibility !"



हा आहे दादरचा कबुतरखाना ! माझी आई दादरची ..तिचे सगळे बालपण शिवाजीपार्कच्या समोर केशवभुवन मध्ये गेले...त्यामुळे दादर मधून जात असताना "आई एकडे लहानपणी गेली असेल का ?"या विचाराने मला वेडावून सोडले होते...




माझी आई बँक ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षापेक्षा जास्त नोकरी करते आहे....तिच्या साठी हा फोटो काढून आणला कारण याच इमारती मधून तिने कॉलेजनंतर नोकरी चालू केली होती...



या इमारतीचे दगड म्हणा किंव्हा texture म्हणा मला मोहून टाकत होते....माझी अन्न्दाती बँक म्हणून फोटो सहज खपून जाईल....



Taxi मधून ५० kmph ला काढलेला फोटो येवढा चांगला येईल असे वाटले नव्हते....हाजी-अली चा दर्गा !



हा फुटपाथ आहे या वरती माझा आधी विश्वासच बसत नव्हता....आत्ताच्या काळात पण रस्ते वाढवण्याच्या क्रेझ मध्ये पण तो टिकून राहिला हेच मुंबई चे वैशिष्ट्य आहे...




"लव्ह केलिये साला कुच भी करेगा !" वरळी सी-लिंक



क्रॉफर्ड मार्केट ....एवढ्या गर्दी गोंधळा मध्ये मी शांत झालो आणि click केले...आकाश पण सही होते आणि कॅमेराने पण साथ दिली..



१८६३ मध्ये हे वाचनालय चालू झाले...David Sassoon याने त्याकाळी ६०००० रुपयाची देणगी दिली म्हणून हे वाचनालय उभे राहिले...मुंबई चा हा असा इतिहास तिथल्या लोकांमुळे कधी इतिहास वाटलाच नाही...




सायलीने माहिती पुरवली जे डावीकडे दिसते आहे ते वाटसन होटेल आणि उजवी कडचा राजाभाई टॉवर ...आणि मी direct १५ वर्ष मागे पोहचलो....बाबा मला मुंबई दाखवायला घेऊन यायचे "राणीचा बाग,prince of wales museum,म्हातारीचा बूट, getway of India असे करत आम्ही बेस्ट मधून मुंबई फिरायचो..

Sunday, April 10, 2011

माझ्या गावाची लाईट ट्रेल फोटोग्राफी...

सेमिस्टर संपायला आली आहे त्यामुळे सगळी कडून आवळलो गेलो आहे....शेवटी परवा "गेले सगळे खड्यात !" असे म्हणून कॅमेरा घेऊन बाहेर पडलो....कुठे जाणार काहीच नक्की नव्हते....

असच १ मैल चालत चालत एका पुलापाशी पोचलो...तो पूल आमच्या कुकविल मध्ये नॉर्थ विलो रस्त्यावरून जातो... बाजूच्या गवतातून कसे बसे चढून (पोलीस मामा कडे लक्ष ठेवून :)) वर पोचलो आणि वेडा झालो.....
दोन्हीबाजुला किर्र झाडी ...त्यात रेल्वे रूळ अदृश्य झालेले ....खालून ८० मैलाच्या वेगात गाड्या जात आहेत.....वरती चढून त्या रस्त्याला बघून मी ओरडलो.."कुकवील चा किंग कोण ?"...

जोरात जाणाऱ्या गाड्या मला नेहमी hypnotize करतात...तीच गत माझ्या कॅमेराची पण झाली...."long exposure " फोटोग्राफी चालू झाली....सोप्या शब्दात " कॅमेरा चे शटर जास्त वेळ उघडे ठेवायचे आणि फुकटचा प्रकाश येऊ द्यायचा !" ..हे करून नंतर जे पिकासो चे चित्र होते त्याला तोड नसते...

मस्त पैकी tripod लावला आणि चालू झालो....माझ्याकडे SLR कॅमेरा ( माझा कॅमेरा Nikon 90 !) नसल्याने जास्त प्रयोग करता आले नाही...जास्तीत जास्त शटर ८ सेकंद उघडे ठेवू शकलो...

बेक्कार ओवरटेक कसा करायचा हे माझ्या मी पुण्याचा असल्याने रक्तात आहे...पण पहिल्यांदाच प्रकाश रेषेचा ओवरटेक बघत हतो...



पुणे-ठाणे डेक्कन एक्सप्रेस ने प्रवास करतना घाटामध्ये रुळाचे सांधे बदलताना बघणे म्हणजे सोनेपेसुहागा ....तश्याच प्रकारचा अनुभव माझा कॅमेरा टिपत होता...



दोन समांतर रेषा एकमेकांना मिळत का नाही ? .....नसतील मिळत....असतो एकेकाचा स्वभाव...;)
इति ...पुलं ( बिगरी ते म्याट्रिक )



शाळेच्या मैदानात सगळे सरळ पळताना एक चुकार मुलगा जशी मधेच कल्टी मारतो ..तशीच ती लाल रेषा कल्टी मारते आहे...



चौकामध्ये तर अजून मजा होती....कसा फोटो येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता...जेंव्हा ८ सेकंदाने फोटो यायचा तेंव्हा तो पिकासोचे abstract बनून बाहेर यायचा..



मेक्सिकन होटेलची Neon sign मला तुफ्फान आवडते...त्यांनी एका कॅक्टस मध्ये अख्खा मेक्सिको उभा केला आहे .

Friday, March 25, 2011

पुळचट रिआलिटी शो चा शो ऑफ !!!!!

एकडे टेनेसी आल्यापासून माझे टीव्ही पाहणे खूप कमी झाले आहे...म्हणजे मी भारतात असताना जास्त बघायचो असे नाही....पण animal planet,Nat Geo आणि Discovery यात बेक्कार जास्त रमायचो...येथे या वाहिन्यावरती कुत्रे आणि मांजरांचे सगळे कार्यक्रम असतात त्यामुळे माझ्या सारख्या जंगली प्राण्याला ते पाळीव कार्यक्रम बघवत नाहीत....

दुसऱ्या वाहिन्यांवर "रिआलिटी शो" नावाचे भयानक प्रकार चालू असतात....या मध्ये वेगळे वेगळे प्रकार पण असतात...

समाजाने सोडून दिलेल्या ,वाया गेलेल्या मुली एका घरात कोंबायच्या आणि त्यांना मांजरी(मांजरी पेक्षा कमी कपडे असतात त्यांचे ;)) सारखे भांडायला लावायचे..मग तयार होतो "Bad Girls "
असेच मुलं मुली एकत्र टाकायच्या की झालं "Jersey Shore"..
शाळेतल्या मुलांचा अजून बिभत्स प्रकार म्हणजे "Skins"... माझ्या तरुण वयाला पण हे शो एकटे बघताना पण लाज वाटते...मी आई-बाबांबरोबर तर हे शो बघणे कल्पना पण नाही करू शकत......

हे झालं अमेरिकेमध्ये पण भारतात पण या वरुनच "बिग बॉस" निघतो...त्यात पण अशीच निर्लज्ज माकडं एका घरात भरतात.... त्यांचे माकडचाळे वाहिनीचे TRP वाढवतात...
राखीच्या स्वयंवरात लग्नाचा बाजार मांडला जातो...
"रोडीज" लावले की "पिप पिप" सोडून काही ऐकू येत नाही...या रोडीज मध्ये राग व्यक्त करायला एवढ्या शिव्या का द्याव्या लागतात मला अजून समजले नाही...त्या रोडीजचे टास्क म्हणजे तर मला विनोदच वाटतो...पेटीमध्ये परप्रांतीय मुलीला(मराठी मुलीला मी तरी कधी पहिले नाही अजून...;)) झोपवून तिच्या वरती पाण्यातले साप सोडून किवा झुरळे सोडायचे आणि तिच्या इंग्लिश किंचाळ्या लोकांना ऐकवायच्या ..असे सगळे गरीब प्रकार !.....यात तर मला त्या सापांची आणि झुरळांची दया येते...("त्यांनी मागच्या जन्मी पाप केले म्हणून या जन्मी रिआलिटी शो मध्ये काम मिळाले !")

असे अनेक कार्यक्रम रिआलिटी शो च्या नावाखाली सुशिक्षित लोकं उत्साहाने बघत असतात... यामध्ये रिआलिटी कुठे येते हे त्याचं त्यांनाच माहित...हीच गोष्ट जेम्स वेलस्ली त्याच्या "रिअल" या गाण्यातून सांगतो...आपण जे आयुष्य जगत असतो ते या रिआलिटी शो मध्ये कधीच दाखवत नाहीत....जे काही दाखवतात ते रिआलिटी च्या जवळपास पण जात नाही...म्हणूनच हे गाणं आपल्याला खूप शांतपणे आपल्याला खऱ्या रिअलिटी कडे घेऊन जाते...



रिआलिटी शो च्या एका भागामध्ये ती मुलगी "तो" तिच्या प्रेमाला उत्तर देत नाही म्हणून रडते ...पुढच्या मध्ये ते दोघे एकत्र येतात ( ते कसे जवळ येतात आणि काय काय करतात हे देशा-देशावर अवलंबून आहे...;))...नंतरच्या भागामध्ये तो तिला सोडून जातो .....मग प्रेमभंगाचे नाटक आणि दुसऱ्याच्या खांदा ... शेवटी येरे माझ्या मागल्या ...

याला थोडीच रिआलिटी म्हणतात....?

५७ वर्षाचा सुखी संसार करून आपली बायको आपल्या खांद्यावर शेवटचा श्वास घेते... तेंव्हा जे प्रेम वाटते ...एकटे वाटते ...भीती वाटते ..."ते सगळे रिअल....आणि शेवटी ती देवाकडे जाताना तिचे आपल्या डोळ्यात बघणे ती रिआलिटी...!"

आपल्या आजूबाजूचे लोकं,गृहिणी असे रिआलिटी शो सारखे कपडे कधीच घालत नाही .....किंवा त्यांच्या डोक्यावर cowboy hat घालून त्याच्या अंगात धाडस येत नाही..... त्यांचे धाडस म्हणजे महिन्याच्या शेवटी कसे पण करून आहे त्या पैशात "दुध ,पेपर,लाईट ,पाणी बिल भरायचे आणि कुंटुबाला सुखी ठेवायचे ......"हीच ती रिआलिटी आणि हेच त्यांचे खरे धाडस ....."

(२६ जुलै चा )मुंबई चा मुसळधार पाऊस त्यातून survive होऊन लगेच ऑफिस ला जाणारे मुंबईकर...जपान मधला ११ मार्च चा भूकंप त्यातून एकमेकांना आधार देणारे जपानी लोकं..
"अशीच कोणतीही जीव घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे रिअल आणि तिच्याशी मरेपर्यंत लढणारे लोकं म्हणजे रिआलिटी...."

आर्थिक मंदीमुळे नोकरी जाणे ...पैसे नसल्यामुळे राहते घर विकायची वेळ येणे ..बायको-मुलांना रस्त्यावर यावे लागणे .. असे अनेक अवघड संसारिक प्रश्न ...आणि त्याची उत्तरे शोधणारी माणसे ...
"हेच प्रश्न म्हणजे "रिअल" आणि त्यांना भिडणारी माणसे म्हणजे रिआलिटी...!"

जेम्स आपल्या सगळ्यांना मनातून वाटतेच तेच त्याच्या गाण्यात सांगतो...
त्यामुळे अगदीच तुम्हाला रिआलिटी बघायची इच्छा झाली तर Danny Boyle चा "127 hours " बघा ....अनुभवायची असेल तर सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी ८३५ ची CST लोकल ठाण्यावरून पकडा किंवा पुण्याच्या नाविपेठेतल्या विठ्ठल मंदिराच्या ट्राफिकमधून संध्याकाळी गाडी बाहेर काढा....पण हे पुळचट रिआलिटी शो बघणे बंद करा....!

Monday, March 7, 2011

तो एक सैनिक आहे ...!

कुठले पण बातमीपत्र उघडले की महत्वाच्या बातम्या या जगभरातल्या युद्धांच्या असतात.....अमेरिका कशी इराक ,अफगाणिस्तानमध्ये घुसते आहे ?,ओबामा चे मत काय ? लिबिया मध्ये कसे युद्ध पेटले आहे ? ब्रिटीश राज्यकर्ते कसे युद्धाचे डावपेच खेळतात आहे..? या बातम्यांमध्ये फक्त राष्ट्र आणि राजकारणी बदलत असतात युद्ध तर चालूच असते..पण या युद्धाचे प्रमुख घटक सैनिक यांचा कुठेच उल्लेख नसतो...त्यांचे नाव कधी Fortune 2011 च्या यादीत नसते किवा सिलेब्रिटी लिस्ट मध्ये नसते...

जो पर्यंत युद्ध आपल्या घरापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत "अपनेको क्या ?" या attitude मध्ये आपले सगळे आयुष्य निघून जाते ."पैसे,घर ,गाड्या ,बायको-मुलं यातच आपण मग्न होऊन जातो..या सैनिकाची आठवण विरून जाते...

अश्याच एका सैनिकाची आठवण मी तुम्हाला आज करून देणार आहे .....हे गाणं एका "अमेरिकन" सैनिकावर लिहिले आहे...यातला अमेरिकन हा शब्द गौण आहे कारण सैनिकाला देश,धर्म,जातपात काही नसते....युधिष्ठिराने म्हणले आहे की "सैनिक हाच एक एक धर्म असतो..." .हेच सोप्या शब्दात Toby Keith (टोबी केथ ) सांगतो......आपण लोक ज्याचा कधी जास्त विचार करत नाही त्या वरतीच टोबीने हे गाणे लिहिले आहे.....



त्याला पण त्याचे कुटुंब आहे... त्याचे त्याच्या मुलांवर आणि बायको मुलांवर जीवापाड प्रेम आहे ...त्याला पण घरची जवाबदारी आहे...पण जेंव्हा duty वर जायचे पत्र येते तेंव्हा तो काहीच करू शकत नाही कारण "तो एक सैनिक आहे..."

तो सगळ्यांसाठी आहे पण त्याच्या साठी कोणी नाही...तो पैश्यासाठी काम करत नाही...किंवा त्याला प्रसिद्धी पण नको आहे...तो फक्त देशासाठी लढणे माहित आहे कारण "तो एक सैनिक आहे..."

तुमच्या आमच्या सारखे खोटी खोटी कारणे दाखवून तो सुट्ट्या घेत नाही किंवा "चला दिवाळी आली" म्हणून घरी पण येत नाही....तो फक्त देशासाठी आणि देशवासीयांसाठी अहोरात्र जागा आहे...कारण "तो एक सैनिक आहे..."

देशाचे स्वातंत्र्य जेंव्हा धोक्यात येते तेंव्हा तो त्याचा जीव पणाला लावतो.तो धर्म,जात ,पंत याच्या व्याख्येत बसत नाही...त्याला स्वातंत्र्य कधीच मोफत मिळत नाही (आपल्याला मिळणाऱ्या मोफत स्वातंत्र्यासाठी) त्याला त्याच्या जीवाची किंमत मोजावी लागते...
तो स्वतःहून कधीच मरण मागत नाही पण मृत्यू समोर आला तर मरणाला घाबरत नाही.....कारण "तो एक सैनिक आहे..."

हे गाणं ऐका आणि या सैनिकाला कधीच विसरू नका कारण एक लक्षात ठेवा..."तो एक सैनिक आहे" म्हणून आपण सुरक्षित आहोत "!

Wednesday, March 2, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग २ ...!



खूप दिवस वेळच मिळाला नाही thermodynamics ची परीक्षा असल्याने झोपेत मला ग्रीक सिम्बॉलच दिसत होते....आज मात्र दिवसभर लिहिण्यासाठी हात शिवशिवत होते..शेवटी मुहूर्त लागला आणि फेसबुक ची गोष्ट डोक्यात सुरु झाली......फेसबुकने मला वेड लावले आहे असे म्हणता येणार नाही "मी आधीच अनेक गोष्टीसाठी वेडा होतो" ते फक्त जगासमोर खुलं करायची संधी मला दिली आहे....मागच्या भागात काही मराठी स्टेटस मेसेज लिहिले होते या भागात काही इंग्लिश स्टेटस मेसेज पण टाकणार आहे...

मी केमिकल मध्ये मास्टर करत असल्याने "संशोधन"(??) करण्याचे पैसे मिळतात ...त्यासाठी जो माझा बॉस किवा शिक्षक असतो त्याला एकडे "adviser" म्हणतात ..."५ दिवसाचे पैसे देऊन १० दिवसाचे काम" कसे करून घायचे याची कला याला साध्य असते....म्हणून ५ दिवस काम करून २ दिवस काम न करण्याचा प्रयत्न मी करत असतो (पण ते अजून शक्य झाले नाही !) म्हणून माझ्या आयुष्याची व्याख्या सोपी आहे..."My life is simple...5 day Adviser 2 day Budweiser"(बडव्ह्ययझर हे एक सोनेरी रंगाचे पेय आहे...;))


विद्यार्थी असल्याने दिवस लवकर लवकर पळत असतात ...एक सेमिस्टर झाली की दुसरी !.....फक्त वीकेंड चा हिशोब डोक्यात राहतो....या विकेंडला खऱ्या अमेरिकन संस्कृतीचे विश्वरूपदर्शन क्लब मध्ये घडते ...तरुणाई कडे बघून "क्षणभंगुर ती रात्र होती " असेच वाटत राहते .....तसेच मला नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाटले
"मागचे वर्ष कधी संपले ते कळलंच नाही....."US मध्ये दिवस कसे जातात कळत नाही"


नवीन सेमिस्टर चालू होणार होती ...नाताळ च्या सुट्टी मधला आळस गेला नव्हता (घालवायचा पण नव्हता ..;))माझी प्रार्थना चालू होती.."सांग सांग भोलेनाथ ..."बर्फ पडेल का? अंगणामध्ये बर्फ साठून सुट्टी मिळेल का? "
...आणि ४ दिवस सुट्टी मिळाली."
.:)

फेसबुकच्या वॉल वर सगळेच काहीना काही लिहीत असतात ..ते वाचून मला खूप वेळा समजते की त्याची/तिची मनस्थिती काय आहे किवा कोणाचा काय घोटाळा चालू आहे...;) त्यातूनच एक नवीन म्हण निर्माण झाली "फेसबुकच्या वॉलला(भिंतीला) पण कान असतात "


जानेवारी महिना चालू झाला आणि एक दुःखाची बातमी आली "पंत गेले "(प्रभाकर पणशीकर )...मी त्यांची दोनच नाटके पहिली होती तरी सुद्धा त्यांचा मी निस्तीम चाहता चाहता आहे. ...माझ्या डोक्यात त्याक्षणी आले ......तो मी नव्हेच मधला हा लखोबा लोखंडे साक्षात यमासमोर पण म्हणला असेल" तो मी नव्हेच !"


२ महिन्यापूर्वी एका मित्राचे बेक्कार ब्रेंक अप(complete दोन्ही जीवाची तडफड इ.) झाले...त्याचे मला सारखे फोन यायचे आणि मग माझे अनुभवाचे सल्ले चालू व्हायचे..माझ्या अनुभवाचा एक सल्ला त्याला ऐकवला "Behind every successful man, there is an "Ex Girl friend"..त्यामुळे तो मित्र आत्ता यशस्वी बनायच्या मार्गावर आहे...


शाळेत असताना विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर मी आनंदीबाईना बेक्कार शिव्या घातल्या होत्या ...त्याच आठवणी परत मागच्या महिन्यात जाग्या झाल्या कारण पानिपतच्या लढाई ला १५० वर्ष झाली होती ....तेंव्हा एक डोक्यात विचार आला ""पूर्वीच्या काळी "स्पेल चेक" असते तर आनंदीबाई कडून "ध चा मा " झाला नसता ....आणि मराठे शाही वाचली असती..."


असे हे माझे स्टेटस मेसेज चे प्रयोग चालूच असतात ..त्या खाली येणाऱ्या comments वाचून हसून हसून मी संपून जातो...यामुळे माझा खूप मित्रांशी संवाद वाढला आहे ...ते नुसते लिस्ट मधले फोटो न राहता माझे मित्र बनून रोज समोर येतात.....

Saturday, February 12, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग...!



"FACEBOOK" हे या मागच्या काही वर्षातले व्यसन ....पण आत्ता तो धारावी पासून time square पर्यंत सगळी कडे पसरले ....मी पण त्याची शिकार झालो.... २००९ चालू झाले तेंव्हा मला कोणी सांगितले असते की "फेसबुक भारी आहे" तेंव्हा मी त्याला वेड्यात (सभ्य शब्द !)काढले असते...

त्याकाळी ऑर्कुट जिवंत होते पण मी त्याची शिकार वैगैरे झालो नव्हतो...एकडे Cookeville ला आलो तेंव्हा पासून ऑर्कुट मृत्यू शय्ये वरती होते..आणि थोड्या दिवसात ते वारले ...आणि मग माझ्या फेसबुक वरती एकावेळी असे ४० लोक वगैरे online दिसायला लागली..माझा फेसबुक वेड येथून चालू झाले....जे काही सुचेल ते status मध्ये टाकायचे ,नवीन फोटो काढला ,गाणं ऐकले की टाक फेसबुक वर असे चालू झाले...त्यातूनच भन्नाट अश्या काही status मेसेज चा जन्म झाला...याच प्रत्येक मेसेज ची एक वेगळी कहाणी आहे...

भारत सोडताना २ वेळचे फुल तूपभात जेवण आणि संध्याकाळी पोहे,सांजा अश्या वाईट सवयी लागलेल्या त्याच घेऊन मी एकडे आलो...येथे तर मला कोणी हे सगळं देणे शक्य नव्हते ..स्वतःला जगवण्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून अंडी खायला चालू केली... मग काय सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचे खाणे..यात सगळ्या मध्ये अंड्याने एंट्री मारली....

म्हणूनच मी म्हणतो "माझ्यासठी अंड हेच पूर्णब्रह्म !"..

याच अंड्याची आम्लेट बनवत होतो...पण ते खूप वेळा मला उलटवता न आल्यामुळे त्याची भुर्जी व्हायची ...असच करता करता मी "आम्लेट उडवायला शिकलो!"

एक दिवस दुपारी गौतम-निवेदिताने घरी जेवायला बोलावले आणि त्या "गरम पोळ्या आणि वांग्याचे भरीत खाऊन मला मोक्ष मिळाला.."!


प्रत्येक सणासुदीच्या दिवशी घरची मला खूप आठवण येते ....दिवाळी आली तर इमोशनल अत्त्याचार होतो.सगळं लहानपण आठवते त्यातून मग हा मेसेज आला.

."चकलीच्या भाजणीचा वास ,मातीचा अळीव पेरलेला किल्ला ,कंदीलातून झिरपणारा केशरी प्रकाश,रस्त्यावरचा फटक्याचा धूर ,kingcong छाप सुतळी बॉम्ब "...या गोष्टी online मिळतात का कुठे ...

स्वदेसचे "ये जो देश हे मेरा "२६ जानेवारी ला ऐकत होतो...आणि एकदम मला माझी शाळा आठवली...

"न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान...खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शुभ्र शर्ट....खिश्यावर तिरंगा पुढे चितळे उभा आणि मागे बिडकर ... "सावधान !" ...पाटील सर घुमटावर ध्वजारोहण करत आहेत......जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य-विधाता.".....
हा मेसेज माझ्या अनेक शाळा मित्रांना माझ्या बरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळेत घेऊन गेला...


असे म्हणतात की "पुणे" आह शब्द कशाशी पण जोडला गेला की ते प्रसिद्ध होतो...मी तर पक्का पुणेकर त्यामुळे पुण्यावर लिहिणे हा माझा जन्म सिद्ध हक्क...!

"पुणेकराबरोबर वाद घातल्यास पुढचा जन्म पुण्यात आणि तो पण सदाशिवपेठे मध्ये मिळेल !!!"..या मेसेज बद्दल कोणाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही....
सदाशिव पेठेची कीर्ती इस्कीमो लोकांपर्यंत नक्की पोचली असेल....

MTV चा रोडीज हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम...त्याची सुरवातीची निवड फेरी मी बघत होतो ...तो रघू आणि राजीव शिव्या सोडून काही बोलतच नव्हते.. त..म्हणून मला वाटले...

"रोडीचे ऑडिशन घेण्याच्या आधी रघु आणि राजीव ला सदाशिवपेठेच्या दुकानामध्ये दुपारी १ ते ४ मध्ये पाठवायला पाहिजे म्हणजे त्यांना शिव्या न देता लोकांचा अपमान कसा करायचा ते तरी कळेल..." मला खात्री आहे की असे शिक्षण घेऊन आले तर पुढच्या निवड फेरी मध्ये त्यांना शिव्यांची कुबडी वापरावी लागणार नाही....

मला पुण्याची बेक्कार आठवण येते नेहमी...लोकांच्या मनात स्वप्नसुंदरी वगैरे येत असतील माझ्या स्वप्नात पुण्यातले रस्ते,गल्ल्या ,पण टपऱ्या ,अमृतुल्य येतात...मी २ वर्ष झाली घरी गेलो नाही म्हणून मला गौरी विचारात होती की तू होम सिक वगैरे होत नाही का....तर माझा उत्तर होते...

"आय नेवर गेट होमसिक बट आय म आल्वेज गेट पुनेसिक....."(I never get homesick but I am always get Punesick ")

हे असेच काही माझ्या मनात येईल तसे लहित असतो...अजून खूप काही बाकी आहे...पुढच्या भागात अजून विषय आणि मेसेज लिहीन....ही न संपणारी कथा तुम्हाला नक्की आवडेल...

Friday, February 4, 2011

स्वयंपाकाची पहिली इयत्ता पास !!!

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे आई असे साधे उत्तर आहे.त्यामुळे माझा चहा आणि आम्लेट पर्यंतच gas चा संबध आला होता.तसा मी चहाची गाडी टाकू शकतो येवढा तो बरा व्हायचा.मी आणि नन्या (हेय नाव नेहमीच आत्ता पुढे येणार आहे !) चहा आणि अंडाभुर्जी ची गाडी लावणार होतो पुलं देशपांडे उद्यानासमोर पण आता ते राहून गेले बहुतेक आत्ता Times Square ला लावू. असो.

कॉलेजनंतर मी बंगाल मध्ये आणि कर्नाटका मध्ये नोकरी ला गेलो पण तिकडे एवढे सही जेवण असायचे की घरी बनवायचा प्रयत्न केला नाही.(बंगाली मिठाई नाव नका काढू !) त्यामुळे रस्सम आणि रस्गुल्ल्या मध्ये एक वर्ष निघून गेले. आई नेहमी म्हणायची की "स्वयंपाक शिक् म्हणजे कमीत कमी तुझी बायको तरी मला शिव्या घालणार नाही "...पण कधी मनावर घेतले नाही.

जेव्हां एकडे शिकायला याचे ठरवले तेव्हां वाटायचे की आपण एवढे मोठया reactor मध्ये प्रयोग करतो तसे छोट्या कढई मध्ये करयचे .फक्त "low temperature and open to atmosphere reactor".म्हणून फक्त पद्धत माहिती असली की झालं .एका मागून एक गोष्टी टाकत जायच्या आणि Reaction झाली की gas बंद करायचा असा साधा पुस्तकी विचार केला होता.त्यासाठी मग जय्यत तयरी केली काही पुस्तके विकत घेतली ,sites bookmark केल्या.आणि महत्वाचे म्हणजे आई चा स्वयंपाक २ दिवस बघितला.त्यावरून एक ढोबळ आराखडा बांधला की फोडणी घातली की झाला पुढचं बाप्पा बघून घेईल.

जेव्हां मी एकडे आलो तेव्हां काही पण म्हणा मला आत्मविश्वास बेक्कार जास्त होता.दुसऱ्या दिवशीच मी म्हणलं जरा लाईनीप्रमाणे जाऊ म्हणून चहा बनवायला घेतला.नेहमीच्या सवयीने gas मध्यम ठेवला आणि चहा टाकून पाणी उकळायची वाट बघत बसलो . खूप वेळ वाट बघितली खालची coil तर तापली होती पण पाणी उकळायचे नाव नव्हते. शेवटी कंटाळून gas पूर्ण वाढवला.आपण चूक केली आहे हे कळायच्या आत ते चहा मिश्रित पाणी उतू गेले होते.तरी आपली चूक नाही आपली पद्धत बरोबर आहे coil ची चुकी आहे असे म्हणून दुधावर समाधान मानले.ही तर सुरवात होती.
मग माझ्या स्वयंपाकाच्या turns चालू झाली.पहिल्या दिवशी विचार केला की जीरा राईस बनवू (पद्धत डोक्यात पक्की !)

सगळे मसाले आणि चमचे नीट बाजूला काढून ठेवले.(पद्धत !)पहिला तेलाचाच अंदाज चुकला. जीरा आणि कांदा एकदम टाकला.घरच्या फोडणीचा जसा वास येतो तसा आला थोडा.मग काय confidence अजून वाढला .त्यात लगेचच शिजलेला (electric cooker वर ) भात टाकला पण कालवायचे कसे ? हे फक्त पहिले होते...त्यामुळे तो भात चिकटला ..त्यातून gas लहान करणे माहित नव्हते.असे सगळं चालू असताना त्यात चव येण्यासाठी मिरची( फोडणी मध्ये विसरलेली !) आणि मीठ घातले.शेवटी कळले की हे जे काय आहे ते भयानक आहे .त्या रात्री तो भात घशात उतरताना त्या भाताला पण त्रास झाला असेल.

नंतर आठ महिने असे अनेक अपघात होत राहिले.कधी मिरची चा अंदाज चुकला ,कधी फोडणी देताना कांदा जाळला, भाजीत मसाला न पडता मसाल्यात भाजी पडली, अंडा भुर्जी मध्ये अंडे कच्चे राहिले असं सगळं permutation and combination ने सगळ्या चुका करून झाल्या.या दिवसात मी फक्त बटाटा,डाळ आणि जास्तीत जास्त अंड या मध्येच खेळत होतो.confidence तर कधीच काळाच्या उदरात गडप झालं होता....;) .

या आठ महिन्यात स्वयंपाक नाही आला तरी Patience वाढला . असेच करून बटाटा भाजी चा बेस पक्का झाला.आमच्या घरचा नियम आहे की जेवण खाण्याजोगे नसेल तेव्हां पिझ्झा मागवायचा . माझ्या रुममेट्स ना चांगली सहनशक्ती असल्याने मी २ वेळाच पिझ्झा मागवला. आत्ता तर मागचे काही महिने पिझ्झा मागवायची वेळ आली नाही.
जेव्हां मला फोडणी जमायला लागली तेव्हां मी स्वयंपाकाची "पहिली" इयत्ता पास झालो असे वाटायला लागले.ही पहिली पास होण्यासाठी मला अनेकांनी मदत केली,अनेकांनी माझा स्वयंपाक ना चिडता खाल्ला. आत्ता दुसऱ्या इयत्तेसाठी मी तयार झालो आहे.आत्ता कुठे आईच्या चिमूट भर प्रमाणाचे महत्व कळले आहे.

एक प्रसंग आणि भाषा अभिमान....

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

हा प्रसंग मी दुर्गापूर(पं.बंगाल) ला नोकरी करत असताना घडला.रविवारी कामावरती मला कणकण जाणवत होती म्हणून मी कशी तरी गाडी चालवत घरी आलो आणि मेल्यासारखा झोपलो.कशी काय झोपेत कलकत्ता high way वरती गाडी चालवली रमण्या गणपतीला माहित ! जेंव्हा जाग आली तेव्हा सात वाजले होते आणि माझे तापाने बारा ! कसा तरी घरमालकाला विचारून एका डॉक्टर कडे जाऊन त्याची appointment घेतली.रात्री तसाच काही तरी खाऊन झोपलो.

सकाळी ९ वाजता बोलावले होते म्हणून जरा आधीच गेलो .पण तिकडे त्याच्या कडे appointment फक्त नावाला होती.त्याच्या स्वताच्या घरात त्याचा दवाखाना होता.हॉल मध्ये मध्ये गर्दी होती आणि तो dinning room मध्ये बसून पेशंट तपासात होता.मुख्य म्हणजे त्या घरात सगळा सिगरेट चा धूर भरून राहिला होता.(माझी passive smoking ची सवय मला कामा आली..! ).तो डॉक्टर दुर्गापूर स्टील प्लांट चा निवृत्त डॉक्टर होता.पांढरे केस आणि तो सिगरेट चा निखारा एवढीच आठवण आहे मला.तशा धुरात १ तास बसल्या वर माझी पाळी आली.तो पर्यंत मी त्या धुराने संपलो होतो.
डॉक्टर समोर गेलो आणि त्याने मला बंगाली मध्ये विचारले,"काय झालं आहे ?" मला बंगाली कळते म्हणून मी हिंदी मध्ये सांगयला लागलो .त्याने मला थांबवले आणि बंगाली मध्ये परत विचारले "गाव कुठलं ? मी पुण्याचा आहे कळल्या वर तो म्हणाला की "तू बंगाली मध्ये बोलल्या शिवाय मी तुला तपासणार नाही आणि या भागात कोणाला पण तुला तपासू देणार नाही."!

मी हादरलो ! तरी मी आपली हिंदी सोडली नाही .त्याला पटवून द्यायला लागलो की एकडे मी नवीन आहे मला बंगाली अजून बोलता येत नाही .खरं म्हणजे त्यावेळी माझ्या अंगात बोलण्या एवढी पण ताकत नव्हती.तो बोलायला लागला " मग तो राज ठाकरे मराठी भाषे ची सक्ती का करतो आहे?मी बंगाल मध्ये राहतो मी का बंगाली सोडू.?मी रोज "आजतक " वर पाहतो की कसे महाराष्ट्र मध्ये परप्रांतीयांना हल्कून देत आहे.मला पण असे आसाम मधून हल्कून दिले .येवढा मोठा डॉक्टर पण लोकांना भाषा आणि प्रांत महत्वाची !(तिकडे मी असाह्य पणे त्या सिगरेट च्या धुरात बसलो होतो!)आता मी माझ्या मुलाला पुण्यात पाठवीन का ? मला काय भरोसा की ते राज ठाकरे चे लोक त्याला मारणार नाहीत.तू देतो का भरोसा ?"
मला त्या क्षणी त्या आजतक वाल्यांना अलका च्या चौकात नेऊन मारावासे वाटले.पहिल्यांदा मी माझा मराठी चा अभिमान ताब्यात ठेवला आणि त्याला सांगितले की हे media वाले सगळी वाट लावून टाकतात ,माझे खूप बंगाली मित्रमैत्रिणी आहेत पुण्यात ,तुम्ही पण पुण्यात येऊन हॉस्पिटल ला join होऊ शकतात असं बरच काही बोललो......यात जवळ पास अर्धा तास गेला. पण त्याने बंगाली सोडले नाही पण बहुदा कंटाळून त्याने मला औषध दिले.

तो जो अर्धा तास मला माझ्या कंपनी interview पेक्षा अवघड गेला.मी नंतर बरा झालो ती गोष्ट वेगळी ! मला त्या डॉक्टर चे कौतुक वाटले की तो त्याचा भाषेचा अभिमान जपत होता पण त्याच वेळी वाटले की patient समोर असतना त्याने असे वागायला नको होते.कधी वाटले त्याने जे भोगले तसा तो वागला का media च बोलत होता त्याच्या तोंडून...
भाषेचा अभिमान मला पण आहे पण कुठे दाखवला पाहिजे याची जाणीव या प्रसंगानंतर झाली आहे ...

असली "चमेली" !



(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

मी दुर्गापूर ला city center या शहराच्या मध्यवर्ती भागात एकटा राहायचो.मी माझी गाडी पुण्यावरून तिकडे घेऊन गेल्यामुळे मला मस्त पणे सगळी कडे फिरता यायचे.खूप खायचो-प्यायचो मजा करायचो.मला नवीन गावामध्ये नवीन नवीन दुकाने शोधण्याची सवय आहे .त्यामुळे माझा timepass होतो आणि नवीन लोकांशी ओळखी होतात . असाच एक मी ज्यूस वाला शोधून काढला होता. त्याचे दुकानं city center च्या बस stop जवळ होते त्यामुळे ते बेक्कार चालायचे.त्याचा नाव "छोटे" होते.छोटे सुंदरबन (पं.बंगाल) वरून दुर्गापूर ला नशीब काढायला आला होता.
त्याच्याशी मी खूप गप्पा मारायचो.तो बंगली लोकांचे किस्से सांगायचा. माझी पण बंगाली ची practice व्हायची.त्याला वाटायचे की मी मुंबई च्या जवळ राहतो म्हणजे मी करीना कपूर ला खूप वेळा भेटलो आहे.त्याच्या म्हणण्यानुसार एका गावातली माणसं एकमेकांना ओळखत असतात.म्हणून तो मला करीना कपूर बद्दल खूप काही विचारायचा.असे आमचे सवांद चालायचे .

असच एकदा संध्याकाळी मी त्याच्या कडे जाऊन करीना बद्दल त्याच्याशी गप्पा मारत होतो.तेवढ्यात एक family आली आणि माझ्या बाजूच्या खुर्ची वर बसली.तो त्यांना ज्यूस बद्दल विचारत होता तो पर्यंत मी निरीक्षण करत बसलो. दोन मुली आणि आई बाबा अशी family होती.एक मुलगी नववी आणि दुसरी बारावी पर्यंत असेल .कपड्या वरून जरा बऱ्या घरचे दिसत होते.छोटे ने ज्यूस दिला आणि परत आमच्या गप्पा करीना वरून चालू झाल्या.त्या मुली पण आमच्या गप्पा मध्ये सहभागी झाल्या.मला काहीतरी वेगळे वाटत होते पण काय ते सांगता येत नव्हते.

छोटे ला एवढे आवडत नव्हते की मी त्यांच्याशी बोलतो आहे. तो सारखा विषय बदलायचा प्रयत्न करत होता.मी आपला chill मारत होतो. येवढ्यात एक माणूस आला maruti van मधून आणि तो मुलींचा बाबा त्याच्याशी बोलयला गेला.मला एवढंच कळले की ते पैश्याच्या गोष्टी करत आहेत.काही तरी "कित्तू दाम ,कितना होबे " असे काही तरी बोलत होते. "५ हजार टाका " हे मला शेवटचे शब्द ऐकू आले.त्या नंतर ती Family गाडी मध्ये बसून निघून गेली.
माझ्या कडे बघत छोटे ने शांत पणे विचारले, "क्या साब, असली "चमेली" को देखा क्या ?"

मला ते डोक्यात जायला २ सेकंद लागले आणि मी मुळापासून हादरलो.त्या सातवी तल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला .ज्यांच्याशी आपण इतक्या वेळ बोलत होतो त्या वेश्या होत्या हे माझा तूपभात मन मानायला तयार नव्हते.तो छोटे बोलत होता पण मला काही ऐकू येत नव्हते . स्वदेस मध्ये शाहरुख जसा सुन्न होतो त्या पेक्षा मी बेक्कार सुन्न झालो .मी गप् केले छोटे ला आणि सुटलो तिकडून .....एक कटींग टाकल्यावर डोकं ताळ्यावर आलं...

मी चमेली पहिला आहे किवा डॉ.अनिल अवचटांचे "उभे धागे आडवे धागे " मधला कामाठीपुरा चा लेख वाचला आहे.या विषयाबद्दल वाचून आणि चांगल्या media मधून बराचसा परिचित आहे.मित्रांबरोबर या विषयावर चर्चा पण केल्या आहेत.पण त्या क्षणी मला खूप भीती वाटली.त्या प्रंसगी त्या वेश्या जर ओठाला लाली लावून माझ्या समोर असत्या तर मला जास्त काही वाटलं नसतं.पण एकडे पूर्ण चित्रच फ्रेम सोडून बाहेर गेले होते.आत्ता पण ती शाळेतली वाटणारी लहान मुलगी काय काय सहन करत असेल याची मी कल्पना पण करू शकत नाही."वेश्या "ही शिवी नाही ती पण माणसं आहेत हे त्यादिवशी प्रत्यक्ष जाणवले मला.नशिबाने"मजबुरी "काय असते याची झळ आपल्या पैकी बहुतेकांना कधी लागणार नाही.पण वेश्या हा शब्दच मजबुरी मधून तयार झाला आहे.मी सुरक्षित समाजामध्ये वाढलो यासाठी मी समाजाचा नेहमीच ऋणी आहे.
शेवटचे ,हा किस्सा मी अनेक लोकांना सांगितला पण सगळ्यांची एकच reaction होती ती म्हणजे कुहुतुल.!!! आणि याचं reaction ने मला या किस्स्यापेक्षा जास्त हलवून टाकले

(Courtesy to google.com)

एका गारुड्याचा जन्म...


(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

आत्ताच नागपंचमी होऊन गेली तेव्हां मला अनेक नवीन मित्रांनी नेहमीचा प्रश्न विचारला " तू साप पकडायला कसा काय लागलास ?"(हा प्रश्न मला आत्ता पर्यंत अनेक भारतीय ,चीनी,अमेरिकन लोकांनी आश्चर्य दाखवत विचारला आहे .) तसा पाहता मी एक केमिकल इंजिनियर आणि चष्मा घालणारा बारीक मुलगा आहे त्यामुळे आधी लोकांचा विश्वास बसत नाही की मी पुण्यात लोकांच्या घरी जाऊन साप पकडायचो(clean shave आणि चष्मा हा गारुडी लोकांच्या फ्रेम मध्ये बसत नाही ! )...

याची सुरवात मी engineering च्या पहिल्या वर्षाला असताना झाली.तेव्हां मी ड्रॉप घेतला होता त्यामुळे माझ्या कडे जवळपास ८ ते ९ महिने होते. आई बाबा मला कुठले कुठले course करायला सांगत होते आणि मी "हो हो " म्हणत दिवस काढत होतो ..नेहमी सारखे "पुढे काय ?" हा प्रश्न होताच .जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या काका च्या एका युरोपिअन बॉस ला पुणे फिरवता फिरावता कात्रज सर्पोद्यान ला घेऊन गेलो .तिकडे माझी एक लांबची मैत्रीण काम करायची तिने आम्हाला सर्पोद्यान फिरून दाखवले.खरं सांगतो तेव्हां मला एक पण साप ओळखता येत नव्हता.सगळे लोक बघतात तसे मी "आएला तो बघ ,ती मगर हलत का नाही ? " असे प्रश्न विचारत फिरलो .घरी आलो आणि विचार आला की "आपण जाऊ शकतो का सर्पोद्यान मध्ये कामाला ?"(कशाच्या बळावर तो विचार आला ते अजून मला माहित नाही. )तो दिवस होता ३० जानेवारी !
दुसऱ्या दिवशी गाडी काढून तडक सर्पोद्यानात गेलो. "राजाभाऊ" सर्पोद्यानाचे manager त्यांना सांगितलं,"मला निसर्ग आवडतो ! आणि मला आत्ता वेळ आहे ! " या दोन वाक्यामध्ये माझी सर्पोद्यान मध्ये एन्ट्री झाली.त्यांनी पण चेहरयाकडे बघून सांगितले "येत जा उद्या पासून, पण तुला कोणी काही हात धरून शिकवणार नाही ,discovery channel वर दिसते तेवढे हे सोपे नाही ....."

मी चिल मारत घरी आलो कारण आत्ता मला काम मिळाले होते .आईबाबांना सांगितले की मी उद्यापासून सर्पोद्यान मध्ये काम करायला जाणार आहे , तेव्हां ते आधी त्यांना मी काय बोलतो आहे तेच झेपायला वेळ लागला ...(माझ्या सात पिढ्यांमध्ये कुत्रा पण कधी कोणी पाळला नव्हता !)पोराचे हे खूळ उतरेल काही दिवसात असे वाटल्याने मला परवानगी मिळाली .पण हे खूळ कधीच कधीच उतेरले नाही .....
पुढचे ७ महिने मी सर्पोद्यानला वाहून घेतले.सुरवातीचे दिवस बिलकुल सोपे नव्हते पण एक बरे होते की मला माझी मर्यादा माहित होती.झाडांना पाणी घाल ,कासवाचे cage साफ कर ,साफ सफाई कर अशी खूप साधी कामे केली .नंतर हळू हळू राजाभाऊ आणि अण्णांचा विश्वास बसत गेला तसे तसे मी सर्पोद्यानचा होऊन गेलो.साप कसे काय मला ओळखायला लागले मी त्यांना पकडायला कसा शिकलो मला पण माहित नाही.जगातल्या सर्वोत्तम लोकांच्या बरोबर काम केल्यामुळे सगळं जमून गेलं.त्यादिवासामध्ये मी घरी फक्त ४०% सांगायचो ."सुसरीच्या pit मध्ये उतरून साफ करायचो!" अशा गोष्टी सांगितल्या असत्या तर आईला वेड लागले असते...तिकडचे लोक करू शकतात तर मी पण करू शकतो एवढंच विचार करून मी काम करायचो.कधी कधी विचार न करता पण पण अवघड कामे करायचो नंतर वाटायचे की विचार केला असता तर हे काम नसतो करू शकलो.("सोचुंगा तो करूंगा कैसे!").त्याच काळामध्ये मी राजाभाऊ बरोबर पुण्यामध्ये लोकांच्या घरात आलेले साप पकडायला जायचो.बाबा (पटवर्धन )बरोबर लोकांचे कॉल करायचो .(कॉल मध्ये विषारी,बिनविषारी साप,घोरपड,घर,घुबड असे अनेक काही ...)रोज वेगळीच excitement असायची .

नंतर college चालू झाल्या पासून मला एकट्याला कॉल यायला लागले .(मित्र मला कॉल बॉय म्हणायचे !)माझी सापाची पिशवी आणि स्टिक तयार असायची. कॉल आल्यावर कमीत कमी वेळे मध्ये पत्ता विचारून तिथे पोचणे स्किल असायचे .त्यातून पुण्यात पत्ता विचाराने म्हणजे लोकांचे १०० प्रश्न्न !असे करून त्या जागी पोचणे लोकांचा अंदाज घेणे,साप कुठे आहे ,जातीचा अंदाज आणि मग शेवटचे म्हणजे पकडून त्याला पिशवी मध्ये टाकायचा.मग चालू व्हायचे लोकांचे असंख्य प्रश्न . यासगळ्या कॉल मधले साप पकडणे फक्त जास्तीतजास्त ५ मिनटे चालायचे .लोकांना सांभाळणे कठीण काम असायचे.
सुरवातीला हे सगळं मी नवीन अनुभव म्हणून बघायला लागलो.पण हळू हळू "लोकांमध्ये साप पकडणे हे खूप जवाबदारी चे काम आहे हे मला कळले .हे सर्पोद्यानचे काम घरचे कार्य असल्यासारखे करायला लागलो.बाबाना तर वाटायचे की पोरगा गेलं हाताबाहेर ! पण काही दिवसातच त्यांना "सापवाल्याचे आईबाबा " असे ओळखायला लागल्यामुळे नंतर त्यांनी कधी मला अडवले नाही ."लोकांचा विश्वास आणि साप वाचवणे" या गोष्टी मी गारुडी बनून मिळवल्या.
मित्रांमध्ये मी गारुडी म्हणूनच ओळखला जातो .मला खूप बरे वाटते की या गारुड्याचा जन्म झाला त्यामुळे काही प्रमाणात तरी पुण्यातले साप वाचले !
(फक्त मी साप का पकडायला लागलो हेच मला लिहायचे होते..अजून या वरचे खूप लेख पुढे येणार आहेत...;) ...)
(Courtesy to gettyimages.com)

माझी ब्राझीलची मैत्रीण...




(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


खूप दिवसा पासून हा विषय होता डोक्यात पण लिहिण्यासाठी वेळच होत नव्हता.मी तसा लोकात मिसळणारा मुलगा आहे त्यामुळे मित्र मैत्रिणी भरपूर .एकडे पण आल्यावर अंतरराष्ट्रीय मुला मुलींशी माझी मैत्री लगेच झाली.आज जिच्या बद्दल सांगणार आहे ती मैत्रीण माझी भारतात असताना अनपेक्षित पणे झाली...."कार्ला" माझी ब्राझीलीअन मैत्रीण.

एका मित्राच्या द्वारे तिने माझ्याशी orkut वर संपर्क केला.तिला तेव्हां भारतीय संस्कृती बद्दल माहिती पाहिजे होती.पण मुख्य अडचण होती भाषेची...कारण तिला पोर्तुगीज यायचे आणि इंग्लिश चा तिचा बाजार उठला होता.खरं तर मला फार कंटाळा यायचा तिच्याशी बोलताना कारण माझा पुणेरी इंग्लिश आणि तिचे पोर्तुगीज अशी लढाई चालायची.एक दिवस मला google translator चा उपयोग समजला आणि मग आमच्या गप्पा मस्त पैकी व्हायला लागल्या.तिला मी भारतीय इतिहास सांगितला.तिच्या ज्या भारताबद्दल चांगल्या वाईट समजुती होत्या त्या दूर केल्या.तिला सगळं ज्ञान बॉलीवूड चे सिनेमे पाहून आले होते आणि ते पण DDLJ सारखे.हे सगळं मी तिला पोर्तुगीज मधून सांगितले.ही तर सुरवात होती. जेव्हां तिच्या अभ्यासाचे काम झाले तेव्हां आम्ही अवांतर विषयावर बोलायला लागलो."arrange marriage " म्हणजे काय हे मिला १ तास पोर्तुगीज मध्ये समजून सांगितले....;)

२००९ मध्ये मी भारत सोडला आणि माझ्या नवीन जीवनाची सुरवात झाली.सगळच नवीन भाषा,लोक,प्रदेश अशा वेळी मला नाही माहित कसे पण कार्ला मदतीला आली.मी जेव्हां दमून घरी यायचो तेव्हां (ब्राझील २ तास पुढे) तिची झोपायची तयारी चालू असायची मग मी google translator उघडून बसायचो.तासनतास आमच्या गप्पा चालू व्हायच्या.मला एक एक गोष्टी हळू हळू कळत गेल्या.Recife हे ब्राझील चे समुद्राकीनार्यावरचे झकास गाव त्या गावातले लोक पण तसेच झकास आणि कार्ला याचं गावची.५ दिवस काम करायचे आणि २ दिवस मजा, कुठे रडगाणे नाही,किवा Ipad किंवा Lamborghini ची ओढ नाही.तिने मला सांगितले की आमची संस्कृती खूप free आहे त्याचा खूप लोक फायदा घेतात.त्यामुळे ब्राझील म्हणले की कार्निवल आणि सांबा नाच जगाला दिसतो पण खरे ब्राझील वेगळे आहे.त्यांची पण खूप जुनी संस्कृती आहे.कार्लाचे कुटुंब पण pure catholic आहे.मला हळू हळू ब्राझील ची खरी ओळख पटत गेली.कार्ला चा weak point म्हणजे तिची Family (शेवटी सगळ्या मुली सारख्याच;))

एकदा तिने मला विचारले की तुझ्या देशात लोक दोन लग्न करतात का?(Bollywood च्या ना ..)मी म्हणलो "हो"..तिचे उत्तर होते की "तुझ्या आई ला कार्ला दुसरी सून म्हणून चालेल का ?". मी विकेट काढायला गेलो आणि माझीच दांडी उडवली.
मला उमजले की इच्छा असेल तर भाषा, अंतर या गोष्टी आड येत नाही.आता तर मी तिच्या बरोबर बेक्कार गप्पा मारतो.त्यातून मध्ये football चा worldcup आला .तिने मला एक ब्राझील चा t shirt आणि एक teddy bear पाठवला.मी पण क्रिकेट ला support करतो तसं ब्राझील ला फुल जीव लावून support केला.तिने पण क्रिकेट बघायला सुरवात केली . सचिन ची ती बेक्कार fan आहे...माझ्या पुण्याच्या गोष्टी ऐकून तिने मला एकदा विचारले की तू नोकरी का नाही केली शिकत असताना,आमच्या एकडे तसं केले तर त्या मुलाला मुलगी कधीच मिळणार नाही...मी पण शांत झालो कारण आपल्या एकडे नोकरी म्हणजे शिक्षण झाल्या वर असे समीकरण आहे.तिच्या आईशी बोललो तर मला दाते काकूंची आठवण झाली,सेम टू सेम फक्त भाषा वेगळी.त्यांना गोव्याला याचे आहे एकदा तरी आयुष्यात,सेंट झेवियर चर्च त्यांचे धर्मास्तान आहे.अशी २ वर्ष कधी गेली कळल पण नाही ,कार्ला बरोबर माझी wavelength कधी जुळली आणि कशी काय जुळली हे एक कोडे आहे .

मी आणि ती लोकांना कधी पटवून द्यायच्या फंदात पडलो नाही की आमची मैत्री खरी का खोटी कारण काही झाला तरी मी तिला कधी भेटलो नाही आणि ती मला..पण आम्ही दोघांशी प्रामाणिक राहिलो म्हणून निखळ मैत्री झाली.Social Networking site वरून चांगली मैत्री होऊ शकते हे लोकांना कधी पटणार नाही.वेगळी भाषा,वेगळी संस्कृती असून मला तिचा विश्वास टिकवण्यासाठी कधी तडफड करावी लागली नाही यातच सगळे मैत्रीचे गुपित आहे.ती पण आत्ता इंग्लिश,मराठी शिकत आहे आणि मी पोर्तुगीज कारण पुढच्या आयुष्यात एकदा तरी विधात्याने भेट लिहिली आहे..

Thursday, February 3, 2011

त्या टीव्हीला खड्यात घाल !

मला लहानपणी शाळेमध्ये निबंध असायचा "टीव्ही मानवाला शाप का वरदान? " मी आपली नेहमीचे फायदे तोटे लिहायचो की टीव्ही बघितल्याने माहितीत भर पडते ,जगातल्या बातम्या कळतात आणि तोटे म्हणजे डोळे बिघडतात ,लहान मुळे बाहेर खेळत नाही अशी बाळबोध कारणे ( मला अजून आठवते हा माझा निबंध बाईंनी वर्गात वाचून दाखवला होता.)..आत्ता जेंव्हा हे आठवते तेंव्हा मजा वाटते ...आत्ता जाणवते ही पुस्तकातली कारणे आणि खऱ्या आयुष्यातील कारणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे...."जास्त टीव्ही पाहून लग्न मोडते ,संसार उध्वस्त होतात, वजन वाढून जीवघेणे आजार होतात, रक्तदाब वाढतो असे अनेक काही " याचा विचार कधीच केला नव्हता मी.........हा "इडियट बॉक्स "खरच कधी कधी आयुष्याची मंडई करतो......

ही एवढी मोठी प्रस्थावना वाचून आत्ता तुम्हाला वाटले असेल आत्ता पुढे असेच काही तरी भयाण असेल...पण तो गैरसमज काढून टाका...हे गाणं ३ मिनिटात आपल्याला नाचायला लावते आणि पुढे अख्खा दिवस आपण नाचतच राहतो ..... या गाण्याचा "जोश टर्नर" जरा बसक्या आवाजाचा गायक आहे पण तो वेगळेपणाच त्याच्या या गाण्यात जान आणतो... ...खूप कंट्री गाण्यांचे video एकसुरी दिसतात कारण ते कमी बजेट मध्ये बनवलेले असतात....पण हा video बघा एकदम दिल खुश होऊन जाते...




आपल्या घरात रोजच घडणारी गोष्ट.....गृहिणीचे स्वयंपाक घरातील काम संपवून एकता कपूरची रद्दड मालिका बघते आहे किंवा तिचा नवरा "त्याच त्याच" बातम्या आजतक वर बघत आहे....किती कंटाळवाणे दृश्य आहे हे...!

हेच दृश्य जगातल्या बहुतांश घरात थोड्या फार फरकाने दिसत असते.....

तेच दृश्य बदलण्यासाठी तो तिला एवढंच म्हणतो की "हा टीव्ही सोडून माझ्या बरोबर फक्त नाचायला ये....जगाला विसरून फक्त आपण दोघंच नाचत राहू...!"

"आपले घर छोटे आहे किंवा आपल्याला कोणी बघते आहे का याची चिंता सोडून दे आणि फक्त माझ्या मिठीत ये..."Baby Why Don't We Just Dance"
"बिलकुल लाजू नकोस( "सगळ्याच मुलींना थोडा भाव द्यावा लागतो..;))....माझ्या साठी तू अप्सरा आहेस ..तू जशी आहेस तशी मला खूप आवडते.....मी तुझ्यासाठी वेडा झालो आहे...काही ना विचार करता आपण रात्र भर नाचत राहू...."so Why Don't We Just Dance."

गाणं खूप छोटे आहे ....तसेच ते खूप साधे आणि सोपे आहे...याचं गाण्याप्रमाणे आपण असेच "साधे सोपे" वागलो तर आपले आयुष्य पण खरच खूप सुंदर होऊन जाईल........"
"so baby Why Don't We Just Dance !"

Saturday, January 22, 2011

पुण्याचे पत्ते - माझा छंद !

आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे ....पण तसं नाही ...ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो....ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य ,आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते..."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता ....

कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला...सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो...तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती..ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले....

तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही...किंवा आपल्याला गरज पण नसते...त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होती ...अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो....

आता जरा मुद्यावर येऊयात ...लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते ...मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या...ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे ....मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो...एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा.....आत्ता सांगा पत्ता ?"

ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!)
मी पण माझा सगळ स्कील लावायचो..." VIT पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..OK त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक मटणाचे दुकान आहे..आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो ! त्यांच्या फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो...पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो (engineering च्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा .... तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची.हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे..माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" पाहुणे आले असतील तर अजूनच मजा.....नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे...

माझी सोपी पद्धत होती की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची ...त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो,गल्ल्यामधून जायचो,मामा-मामी चुकवायचो,फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. ...गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा...माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग...वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो...कोपऱ्यावरच्या पानवाल्याला पत्ता विचार,कोणी cricket खेळत असेल त्यांना विचार ,फेरीवाल्याला विचार असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल....) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ).....आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे...आजी-आजोबांना आणि बायकांना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार...;)

सुरवातीला सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले...(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे directly proportional आहे....)खूप वेळा मला जनता वसाहत ,आंबेडकर वस्ती,तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा...तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या ! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी ....आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे...काय दृश्य असायचे ते...माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत....

असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये ...आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही..काही झालं की GPS निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो...
पण माझ्या साठी GPS काही कामाचे नाही ...

कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी direct पुण्याच्या रस्त्यावर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो....

Saturday, January 8, 2011

प्रेमभंगाची प्रार्थना ...(मुलांसाठी...;-) )

आजच एका मैत्रिणीशी बोलताना म्हणलो की आपले आयुष्य पण आत्ता फिल्मी झाले आहे...chat वरती बोलताना लक्षात ठेवायला लागते की तो मुलगा किंव्हा ती मुलगी मागच्या वेळी कोण बरोबर होती....असं असताना स्मरणशक्ती चा चांगला व्यायाम होतो पण असं पण वाटते की कसे कोणी एका relationship मधून दुसऱ्या मध्ये सारखे सारखे जात असतील....त्यांना किती त्रास होत असेल ?का ते एकमेकांना शिव्या घालत असतील...

माणसाचे मन फार विचित्र आहे ज्या मुली/मुला बरोबर आदल्यादिवशी पर्यंत जीव द्यायला ते तयार असते ब्रेक अप झाल्या नंतर जीव घ्यायला तयार होते...प्रेमभंग झाला की मुली हळव्या असतात म्हणून त्या रडतात पण मुलं काय करणार ? तेच या गाण्यामध्ये सांगितले आहे...Jaron चे गाणे फक्त आपल्याला प्रेमभंग झाल्या वर "फक्त प्रार्थना" करायला सांगते....:)






तो कधी चर्च मध्ये गेला नाही कारण सगळं नीट चालू होते पण नंतर जेंव्हा प्रेमभंग झाला तेंव्हा त्याने देवाचे पाय धरले....देव त्याला म्हणाला " जीने तुझी वाट लावली तिच्यासाठी वाईट चिंतून काही होत नसते तुलाच जास्त त्रास होयेल ....त्या ऐवजी तिच्यासाठी प्रार्थना कर...पुढचं मी बघून घेईन !".....;)

"तुझ्या गाडीचे ब्रेक फेल होऊदे ,तुझा वाढदिवस लोंकानी विसरला जावा....तुझ्या डोक्यावर फुलदाणी पडू दे...विमानातून उडताना विमानाचे इंजिन बंद पडू दे......अशा माझ्या अनेक प्रार्थना देवाने ऐकू दे...."

एकदम सोप्या भाषेत तो अशी मजेशीर प्रार्थना करतो...जो माझा मित्र प्रेमभंग झाल्या वर दुःखी होतो त्याला मी गाणे समर्पित करतो..."परत आनंदी होण्याची गुरुकिल्ली फक्त प्रार्थना करणे "!

(हे गाणे विनोदाचा भाग आहे ...कोणी मनाला वाईट वाटून घेऊ नये...)

Tuesday, January 4, 2011

वर्षाची समाप्ती Fall Creek Falls स्टेट पार्क मध्ये ....

३१ डिसेंबर ला कुठे जायचे हा मोठा प्रश्न होता...एकडे आमच्या गावात ३१ची रात्र पुण्या-ठाण्यासारखे लोक रस्त्यावर येऊन साजरी करत नाही म्हणून अशी जागा पाहिजे होती की मजा पण करता आली पाहिजे आणि जरा हटके पहिजे .....क्लब ला तर प्रत्येक विकेंड ला चक्कर असते त्यामुळे तो पर्याय कधीच बाद होता...

हो नाही करता करता Fall Creek Falls स्टेट पार्क ला जायचे ठरले ...आधी कॅम्पिंग चा मूड होता पण तापमान शून्याच्या खाली बघून तो बदलावा लागला...(वेदर डॉट कॉम झिंदाबाद !)शिस्तीत एक घर २ दिवसासाठी बुक केले ...अगदी कमीत कमी गोष्टी घेऊन निघालो...


हीच ती आमची कॅबिन ...सगळ्या सुखसोयीयुक्त अगदी ओव्हन, टोस्टर पण...पार्कच्या आत मध्ये ..आजूबाजूला जंगल,पक्षी आणि शांतता . ..कॅबिन च्या मागे एक मोठा गरम पाण्याचा झाकुजी टब ......म्हणाल तर सगळ्या सुखसोयी त्या पण जंगलच्या मध्य भागी....



२०१० ची शेवटची संध्याकाळ ...मी एकटाच जंगलच्या मध्यभागी ....आजूबाजूला कोणी नाही ...फुल भारी...निळाई मनात घुसत होती...



निळा चकवा ! हा फोटो माझ्या कडे wide angle लेन्स असती तर बेक्कार भारी आला असता...



Fall creek falls स्टेट पार्क अमेरिकेतले खूप चांगल्या पार्क मधले आहे...याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा धबधबा..तो बघताना आरश्यातले एका धबधब्याचे प्रतिबिंब बघतो आहे असं भास होतो.. त्या दोन दिवसात खूप पाऊस पडत होता त्यामुळे जास्त फोटो काढता आले नाही...



"Aperture" जास्त ठेवून हा फोटो काढला ....SLR नसल्यामुळे जास्त प्रयोग करता आला नाही...



हा रस्ता पहिल्या वर मी मानाने लोणावळ्याला पोचलो होतो...



याच पानांना काही दिवसापूर्वी स्वतःचे एक अस्तित्व होते ...पण आत्ता रंगदे बसंती च्या DJ च्या भाषेत तीच पाने दुनियाच्या झमेल्या मध्ये हरवून गेली आहेत...