Saturday, February 12, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग...!



"FACEBOOK" हे या मागच्या काही वर्षातले व्यसन ....पण आत्ता तो धारावी पासून time square पर्यंत सगळी कडे पसरले ....मी पण त्याची शिकार झालो.... २००९ चालू झाले तेंव्हा मला कोणी सांगितले असते की "फेसबुक भारी आहे" तेंव्हा मी त्याला वेड्यात (सभ्य शब्द !)काढले असते...

त्याकाळी ऑर्कुट जिवंत होते पण मी त्याची शिकार वैगैरे झालो नव्हतो...एकडे Cookeville ला आलो तेंव्हा पासून ऑर्कुट मृत्यू शय्ये वरती होते..आणि थोड्या दिवसात ते वारले ...आणि मग माझ्या फेसबुक वरती एकावेळी असे ४० लोक वगैरे online दिसायला लागली..माझा फेसबुक वेड येथून चालू झाले....जे काही सुचेल ते status मध्ये टाकायचे ,नवीन फोटो काढला ,गाणं ऐकले की टाक फेसबुक वर असे चालू झाले...त्यातूनच भन्नाट अश्या काही status मेसेज चा जन्म झाला...याच प्रत्येक मेसेज ची एक वेगळी कहाणी आहे...

भारत सोडताना २ वेळचे फुल तूपभात जेवण आणि संध्याकाळी पोहे,सांजा अश्या वाईट सवयी लागलेल्या त्याच घेऊन मी एकडे आलो...येथे तर मला कोणी हे सगळं देणे शक्य नव्हते ..स्वतःला जगवण्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून अंडी खायला चालू केली... मग काय सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचे खाणे..यात सगळ्या मध्ये अंड्याने एंट्री मारली....

म्हणूनच मी म्हणतो "माझ्यासठी अंड हेच पूर्णब्रह्म !"..

याच अंड्याची आम्लेट बनवत होतो...पण ते खूप वेळा मला उलटवता न आल्यामुळे त्याची भुर्जी व्हायची ...असच करता करता मी "आम्लेट उडवायला शिकलो!"

एक दिवस दुपारी गौतम-निवेदिताने घरी जेवायला बोलावले आणि त्या "गरम पोळ्या आणि वांग्याचे भरीत खाऊन मला मोक्ष मिळाला.."!


प्रत्येक सणासुदीच्या दिवशी घरची मला खूप आठवण येते ....दिवाळी आली तर इमोशनल अत्त्याचार होतो.सगळं लहानपण आठवते त्यातून मग हा मेसेज आला.

."चकलीच्या भाजणीचा वास ,मातीचा अळीव पेरलेला किल्ला ,कंदीलातून झिरपणारा केशरी प्रकाश,रस्त्यावरचा फटक्याचा धूर ,kingcong छाप सुतळी बॉम्ब "...या गोष्टी online मिळतात का कुठे ...

स्वदेसचे "ये जो देश हे मेरा "२६ जानेवारी ला ऐकत होतो...आणि एकदम मला माझी शाळा आठवली...

"न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान...खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शुभ्र शर्ट....खिश्यावर तिरंगा पुढे चितळे उभा आणि मागे बिडकर ... "सावधान !" ...पाटील सर घुमटावर ध्वजारोहण करत आहेत......जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य-विधाता.".....
हा मेसेज माझ्या अनेक शाळा मित्रांना माझ्या बरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळेत घेऊन गेला...


असे म्हणतात की "पुणे" आह शब्द कशाशी पण जोडला गेला की ते प्रसिद्ध होतो...मी तर पक्का पुणेकर त्यामुळे पुण्यावर लिहिणे हा माझा जन्म सिद्ध हक्क...!

"पुणेकराबरोबर वाद घातल्यास पुढचा जन्म पुण्यात आणि तो पण सदाशिवपेठे मध्ये मिळेल !!!"..या मेसेज बद्दल कोणाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही....
सदाशिव पेठेची कीर्ती इस्कीमो लोकांपर्यंत नक्की पोचली असेल....

MTV चा रोडीज हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम...त्याची सुरवातीची निवड फेरी मी बघत होतो ...तो रघू आणि राजीव शिव्या सोडून काही बोलतच नव्हते.. त..म्हणून मला वाटले...

"रोडीचे ऑडिशन घेण्याच्या आधी रघु आणि राजीव ला सदाशिवपेठेच्या दुकानामध्ये दुपारी १ ते ४ मध्ये पाठवायला पाहिजे म्हणजे त्यांना शिव्या न देता लोकांचा अपमान कसा करायचा ते तरी कळेल..." मला खात्री आहे की असे शिक्षण घेऊन आले तर पुढच्या निवड फेरी मध्ये त्यांना शिव्यांची कुबडी वापरावी लागणार नाही....

मला पुण्याची बेक्कार आठवण येते नेहमी...लोकांच्या मनात स्वप्नसुंदरी वगैरे येत असतील माझ्या स्वप्नात पुण्यातले रस्ते,गल्ल्या ,पण टपऱ्या ,अमृतुल्य येतात...मी २ वर्ष झाली घरी गेलो नाही म्हणून मला गौरी विचारात होती की तू होम सिक वगैरे होत नाही का....तर माझा उत्तर होते...

"आय नेवर गेट होमसिक बट आय म आल्वेज गेट पुनेसिक....."(I never get homesick but I am always get Punesick ")

हे असेच काही माझ्या मनात येईल तसे लहित असतो...अजून खूप काही बाकी आहे...पुढच्या भागात अजून विषय आणि मेसेज लिहीन....ही न संपणारी कथा तुम्हाला नक्की आवडेल...

Friday, February 4, 2011

स्वयंपाकाची पहिली इयत्ता पास !!!

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे आई असे साधे उत्तर आहे.त्यामुळे माझा चहा आणि आम्लेट पर्यंतच gas चा संबध आला होता.तसा मी चहाची गाडी टाकू शकतो येवढा तो बरा व्हायचा.मी आणि नन्या (हेय नाव नेहमीच आत्ता पुढे येणार आहे !) चहा आणि अंडाभुर्जी ची गाडी लावणार होतो पुलं देशपांडे उद्यानासमोर पण आता ते राहून गेले बहुतेक आत्ता Times Square ला लावू. असो.

कॉलेजनंतर मी बंगाल मध्ये आणि कर्नाटका मध्ये नोकरी ला गेलो पण तिकडे एवढे सही जेवण असायचे की घरी बनवायचा प्रयत्न केला नाही.(बंगाली मिठाई नाव नका काढू !) त्यामुळे रस्सम आणि रस्गुल्ल्या मध्ये एक वर्ष निघून गेले. आई नेहमी म्हणायची की "स्वयंपाक शिक् म्हणजे कमीत कमी तुझी बायको तरी मला शिव्या घालणार नाही "...पण कधी मनावर घेतले नाही.

जेव्हां एकडे शिकायला याचे ठरवले तेव्हां वाटायचे की आपण एवढे मोठया reactor मध्ये प्रयोग करतो तसे छोट्या कढई मध्ये करयचे .फक्त "low temperature and open to atmosphere reactor".म्हणून फक्त पद्धत माहिती असली की झालं .एका मागून एक गोष्टी टाकत जायच्या आणि Reaction झाली की gas बंद करायचा असा साधा पुस्तकी विचार केला होता.त्यासाठी मग जय्यत तयरी केली काही पुस्तके विकत घेतली ,sites bookmark केल्या.आणि महत्वाचे म्हणजे आई चा स्वयंपाक २ दिवस बघितला.त्यावरून एक ढोबळ आराखडा बांधला की फोडणी घातली की झाला पुढचं बाप्पा बघून घेईल.

जेव्हां मी एकडे आलो तेव्हां काही पण म्हणा मला आत्मविश्वास बेक्कार जास्त होता.दुसऱ्या दिवशीच मी म्हणलं जरा लाईनीप्रमाणे जाऊ म्हणून चहा बनवायला घेतला.नेहमीच्या सवयीने gas मध्यम ठेवला आणि चहा टाकून पाणी उकळायची वाट बघत बसलो . खूप वेळ वाट बघितली खालची coil तर तापली होती पण पाणी उकळायचे नाव नव्हते. शेवटी कंटाळून gas पूर्ण वाढवला.आपण चूक केली आहे हे कळायच्या आत ते चहा मिश्रित पाणी उतू गेले होते.तरी आपली चूक नाही आपली पद्धत बरोबर आहे coil ची चुकी आहे असे म्हणून दुधावर समाधान मानले.ही तर सुरवात होती.
मग माझ्या स्वयंपाकाच्या turns चालू झाली.पहिल्या दिवशी विचार केला की जीरा राईस बनवू (पद्धत डोक्यात पक्की !)

सगळे मसाले आणि चमचे नीट बाजूला काढून ठेवले.(पद्धत !)पहिला तेलाचाच अंदाज चुकला. जीरा आणि कांदा एकदम टाकला.घरच्या फोडणीचा जसा वास येतो तसा आला थोडा.मग काय confidence अजून वाढला .त्यात लगेचच शिजलेला (electric cooker वर ) भात टाकला पण कालवायचे कसे ? हे फक्त पहिले होते...त्यामुळे तो भात चिकटला ..त्यातून gas लहान करणे माहित नव्हते.असे सगळं चालू असताना त्यात चव येण्यासाठी मिरची( फोडणी मध्ये विसरलेली !) आणि मीठ घातले.शेवटी कळले की हे जे काय आहे ते भयानक आहे .त्या रात्री तो भात घशात उतरताना त्या भाताला पण त्रास झाला असेल.

नंतर आठ महिने असे अनेक अपघात होत राहिले.कधी मिरची चा अंदाज चुकला ,कधी फोडणी देताना कांदा जाळला, भाजीत मसाला न पडता मसाल्यात भाजी पडली, अंडा भुर्जी मध्ये अंडे कच्चे राहिले असं सगळं permutation and combination ने सगळ्या चुका करून झाल्या.या दिवसात मी फक्त बटाटा,डाळ आणि जास्तीत जास्त अंड या मध्येच खेळत होतो.confidence तर कधीच काळाच्या उदरात गडप झालं होता....;) .

या आठ महिन्यात स्वयंपाक नाही आला तरी Patience वाढला . असेच करून बटाटा भाजी चा बेस पक्का झाला.आमच्या घरचा नियम आहे की जेवण खाण्याजोगे नसेल तेव्हां पिझ्झा मागवायचा . माझ्या रुममेट्स ना चांगली सहनशक्ती असल्याने मी २ वेळाच पिझ्झा मागवला. आत्ता तर मागचे काही महिने पिझ्झा मागवायची वेळ आली नाही.
जेव्हां मला फोडणी जमायला लागली तेव्हां मी स्वयंपाकाची "पहिली" इयत्ता पास झालो असे वाटायला लागले.ही पहिली पास होण्यासाठी मला अनेकांनी मदत केली,अनेकांनी माझा स्वयंपाक ना चिडता खाल्ला. आत्ता दुसऱ्या इयत्तेसाठी मी तयार झालो आहे.आत्ता कुठे आईच्या चिमूट भर प्रमाणाचे महत्व कळले आहे.

एक प्रसंग आणि भाषा अभिमान....

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

हा प्रसंग मी दुर्गापूर(पं.बंगाल) ला नोकरी करत असताना घडला.रविवारी कामावरती मला कणकण जाणवत होती म्हणून मी कशी तरी गाडी चालवत घरी आलो आणि मेल्यासारखा झोपलो.कशी काय झोपेत कलकत्ता high way वरती गाडी चालवली रमण्या गणपतीला माहित ! जेंव्हा जाग आली तेव्हा सात वाजले होते आणि माझे तापाने बारा ! कसा तरी घरमालकाला विचारून एका डॉक्टर कडे जाऊन त्याची appointment घेतली.रात्री तसाच काही तरी खाऊन झोपलो.

सकाळी ९ वाजता बोलावले होते म्हणून जरा आधीच गेलो .पण तिकडे त्याच्या कडे appointment फक्त नावाला होती.त्याच्या स्वताच्या घरात त्याचा दवाखाना होता.हॉल मध्ये मध्ये गर्दी होती आणि तो dinning room मध्ये बसून पेशंट तपासात होता.मुख्य म्हणजे त्या घरात सगळा सिगरेट चा धूर भरून राहिला होता.(माझी passive smoking ची सवय मला कामा आली..! ).तो डॉक्टर दुर्गापूर स्टील प्लांट चा निवृत्त डॉक्टर होता.पांढरे केस आणि तो सिगरेट चा निखारा एवढीच आठवण आहे मला.तशा धुरात १ तास बसल्या वर माझी पाळी आली.तो पर्यंत मी त्या धुराने संपलो होतो.
डॉक्टर समोर गेलो आणि त्याने मला बंगाली मध्ये विचारले,"काय झालं आहे ?" मला बंगाली कळते म्हणून मी हिंदी मध्ये सांगयला लागलो .त्याने मला थांबवले आणि बंगाली मध्ये परत विचारले "गाव कुठलं ? मी पुण्याचा आहे कळल्या वर तो म्हणाला की "तू बंगाली मध्ये बोलल्या शिवाय मी तुला तपासणार नाही आणि या भागात कोणाला पण तुला तपासू देणार नाही."!

मी हादरलो ! तरी मी आपली हिंदी सोडली नाही .त्याला पटवून द्यायला लागलो की एकडे मी नवीन आहे मला बंगाली अजून बोलता येत नाही .खरं म्हणजे त्यावेळी माझ्या अंगात बोलण्या एवढी पण ताकत नव्हती.तो बोलायला लागला " मग तो राज ठाकरे मराठी भाषे ची सक्ती का करतो आहे?मी बंगाल मध्ये राहतो मी का बंगाली सोडू.?मी रोज "आजतक " वर पाहतो की कसे महाराष्ट्र मध्ये परप्रांतीयांना हल्कून देत आहे.मला पण असे आसाम मधून हल्कून दिले .येवढा मोठा डॉक्टर पण लोकांना भाषा आणि प्रांत महत्वाची !(तिकडे मी असाह्य पणे त्या सिगरेट च्या धुरात बसलो होतो!)आता मी माझ्या मुलाला पुण्यात पाठवीन का ? मला काय भरोसा की ते राज ठाकरे चे लोक त्याला मारणार नाहीत.तू देतो का भरोसा ?"
मला त्या क्षणी त्या आजतक वाल्यांना अलका च्या चौकात नेऊन मारावासे वाटले.पहिल्यांदा मी माझा मराठी चा अभिमान ताब्यात ठेवला आणि त्याला सांगितले की हे media वाले सगळी वाट लावून टाकतात ,माझे खूप बंगाली मित्रमैत्रिणी आहेत पुण्यात ,तुम्ही पण पुण्यात येऊन हॉस्पिटल ला join होऊ शकतात असं बरच काही बोललो......यात जवळ पास अर्धा तास गेला. पण त्याने बंगाली सोडले नाही पण बहुदा कंटाळून त्याने मला औषध दिले.

तो जो अर्धा तास मला माझ्या कंपनी interview पेक्षा अवघड गेला.मी नंतर बरा झालो ती गोष्ट वेगळी ! मला त्या डॉक्टर चे कौतुक वाटले की तो त्याचा भाषेचा अभिमान जपत होता पण त्याच वेळी वाटले की patient समोर असतना त्याने असे वागायला नको होते.कधी वाटले त्याने जे भोगले तसा तो वागला का media च बोलत होता त्याच्या तोंडून...
भाषेचा अभिमान मला पण आहे पण कुठे दाखवला पाहिजे याची जाणीव या प्रसंगानंतर झाली आहे ...

असली "चमेली" !



(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

मी दुर्गापूर ला city center या शहराच्या मध्यवर्ती भागात एकटा राहायचो.मी माझी गाडी पुण्यावरून तिकडे घेऊन गेल्यामुळे मला मस्त पणे सगळी कडे फिरता यायचे.खूप खायचो-प्यायचो मजा करायचो.मला नवीन गावामध्ये नवीन नवीन दुकाने शोधण्याची सवय आहे .त्यामुळे माझा timepass होतो आणि नवीन लोकांशी ओळखी होतात . असाच एक मी ज्यूस वाला शोधून काढला होता. त्याचे दुकानं city center च्या बस stop जवळ होते त्यामुळे ते बेक्कार चालायचे.त्याचा नाव "छोटे" होते.छोटे सुंदरबन (पं.बंगाल) वरून दुर्गापूर ला नशीब काढायला आला होता.
त्याच्याशी मी खूप गप्पा मारायचो.तो बंगली लोकांचे किस्से सांगायचा. माझी पण बंगाली ची practice व्हायची.त्याला वाटायचे की मी मुंबई च्या जवळ राहतो म्हणजे मी करीना कपूर ला खूप वेळा भेटलो आहे.त्याच्या म्हणण्यानुसार एका गावातली माणसं एकमेकांना ओळखत असतात.म्हणून तो मला करीना कपूर बद्दल खूप काही विचारायचा.असे आमचे सवांद चालायचे .

असच एकदा संध्याकाळी मी त्याच्या कडे जाऊन करीना बद्दल त्याच्याशी गप्पा मारत होतो.तेवढ्यात एक family आली आणि माझ्या बाजूच्या खुर्ची वर बसली.तो त्यांना ज्यूस बद्दल विचारत होता तो पर्यंत मी निरीक्षण करत बसलो. दोन मुली आणि आई बाबा अशी family होती.एक मुलगी नववी आणि दुसरी बारावी पर्यंत असेल .कपड्या वरून जरा बऱ्या घरचे दिसत होते.छोटे ने ज्यूस दिला आणि परत आमच्या गप्पा करीना वरून चालू झाल्या.त्या मुली पण आमच्या गप्पा मध्ये सहभागी झाल्या.मला काहीतरी वेगळे वाटत होते पण काय ते सांगता येत नव्हते.

छोटे ला एवढे आवडत नव्हते की मी त्यांच्याशी बोलतो आहे. तो सारखा विषय बदलायचा प्रयत्न करत होता.मी आपला chill मारत होतो. येवढ्यात एक माणूस आला maruti van मधून आणि तो मुलींचा बाबा त्याच्याशी बोलयला गेला.मला एवढंच कळले की ते पैश्याच्या गोष्टी करत आहेत.काही तरी "कित्तू दाम ,कितना होबे " असे काही तरी बोलत होते. "५ हजार टाका " हे मला शेवटचे शब्द ऐकू आले.त्या नंतर ती Family गाडी मध्ये बसून निघून गेली.
माझ्या कडे बघत छोटे ने शांत पणे विचारले, "क्या साब, असली "चमेली" को देखा क्या ?"

मला ते डोक्यात जायला २ सेकंद लागले आणि मी मुळापासून हादरलो.त्या सातवी तल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला .ज्यांच्याशी आपण इतक्या वेळ बोलत होतो त्या वेश्या होत्या हे माझा तूपभात मन मानायला तयार नव्हते.तो छोटे बोलत होता पण मला काही ऐकू येत नव्हते . स्वदेस मध्ये शाहरुख जसा सुन्न होतो त्या पेक्षा मी बेक्कार सुन्न झालो .मी गप् केले छोटे ला आणि सुटलो तिकडून .....एक कटींग टाकल्यावर डोकं ताळ्यावर आलं...

मी चमेली पहिला आहे किवा डॉ.अनिल अवचटांचे "उभे धागे आडवे धागे " मधला कामाठीपुरा चा लेख वाचला आहे.या विषयाबद्दल वाचून आणि चांगल्या media मधून बराचसा परिचित आहे.मित्रांबरोबर या विषयावर चर्चा पण केल्या आहेत.पण त्या क्षणी मला खूप भीती वाटली.त्या प्रंसगी त्या वेश्या जर ओठाला लाली लावून माझ्या समोर असत्या तर मला जास्त काही वाटलं नसतं.पण एकडे पूर्ण चित्रच फ्रेम सोडून बाहेर गेले होते.आत्ता पण ती शाळेतली वाटणारी लहान मुलगी काय काय सहन करत असेल याची मी कल्पना पण करू शकत नाही."वेश्या "ही शिवी नाही ती पण माणसं आहेत हे त्यादिवशी प्रत्यक्ष जाणवले मला.नशिबाने"मजबुरी "काय असते याची झळ आपल्या पैकी बहुतेकांना कधी लागणार नाही.पण वेश्या हा शब्दच मजबुरी मधून तयार झाला आहे.मी सुरक्षित समाजामध्ये वाढलो यासाठी मी समाजाचा नेहमीच ऋणी आहे.
शेवटचे ,हा किस्सा मी अनेक लोकांना सांगितला पण सगळ्यांची एकच reaction होती ती म्हणजे कुहुतुल.!!! आणि याचं reaction ने मला या किस्स्यापेक्षा जास्त हलवून टाकले

(Courtesy to google.com)

एका गारुड्याचा जन्म...


(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

आत्ताच नागपंचमी होऊन गेली तेव्हां मला अनेक नवीन मित्रांनी नेहमीचा प्रश्न विचारला " तू साप पकडायला कसा काय लागलास ?"(हा प्रश्न मला आत्ता पर्यंत अनेक भारतीय ,चीनी,अमेरिकन लोकांनी आश्चर्य दाखवत विचारला आहे .) तसा पाहता मी एक केमिकल इंजिनियर आणि चष्मा घालणारा बारीक मुलगा आहे त्यामुळे आधी लोकांचा विश्वास बसत नाही की मी पुण्यात लोकांच्या घरी जाऊन साप पकडायचो(clean shave आणि चष्मा हा गारुडी लोकांच्या फ्रेम मध्ये बसत नाही ! )...

याची सुरवात मी engineering च्या पहिल्या वर्षाला असताना झाली.तेव्हां मी ड्रॉप घेतला होता त्यामुळे माझ्या कडे जवळपास ८ ते ९ महिने होते. आई बाबा मला कुठले कुठले course करायला सांगत होते आणि मी "हो हो " म्हणत दिवस काढत होतो ..नेहमी सारखे "पुढे काय ?" हा प्रश्न होताच .जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या काका च्या एका युरोपिअन बॉस ला पुणे फिरवता फिरावता कात्रज सर्पोद्यान ला घेऊन गेलो .तिकडे माझी एक लांबची मैत्रीण काम करायची तिने आम्हाला सर्पोद्यान फिरून दाखवले.खरं सांगतो तेव्हां मला एक पण साप ओळखता येत नव्हता.सगळे लोक बघतात तसे मी "आएला तो बघ ,ती मगर हलत का नाही ? " असे प्रश्न विचारत फिरलो .घरी आलो आणि विचार आला की "आपण जाऊ शकतो का सर्पोद्यान मध्ये कामाला ?"(कशाच्या बळावर तो विचार आला ते अजून मला माहित नाही. )तो दिवस होता ३० जानेवारी !
दुसऱ्या दिवशी गाडी काढून तडक सर्पोद्यानात गेलो. "राजाभाऊ" सर्पोद्यानाचे manager त्यांना सांगितलं,"मला निसर्ग आवडतो ! आणि मला आत्ता वेळ आहे ! " या दोन वाक्यामध्ये माझी सर्पोद्यान मध्ये एन्ट्री झाली.त्यांनी पण चेहरयाकडे बघून सांगितले "येत जा उद्या पासून, पण तुला कोणी काही हात धरून शिकवणार नाही ,discovery channel वर दिसते तेवढे हे सोपे नाही ....."

मी चिल मारत घरी आलो कारण आत्ता मला काम मिळाले होते .आईबाबांना सांगितले की मी उद्यापासून सर्पोद्यान मध्ये काम करायला जाणार आहे , तेव्हां ते आधी त्यांना मी काय बोलतो आहे तेच झेपायला वेळ लागला ...(माझ्या सात पिढ्यांमध्ये कुत्रा पण कधी कोणी पाळला नव्हता !)पोराचे हे खूळ उतरेल काही दिवसात असे वाटल्याने मला परवानगी मिळाली .पण हे खूळ कधीच कधीच उतेरले नाही .....
पुढचे ७ महिने मी सर्पोद्यानला वाहून घेतले.सुरवातीचे दिवस बिलकुल सोपे नव्हते पण एक बरे होते की मला माझी मर्यादा माहित होती.झाडांना पाणी घाल ,कासवाचे cage साफ कर ,साफ सफाई कर अशी खूप साधी कामे केली .नंतर हळू हळू राजाभाऊ आणि अण्णांचा विश्वास बसत गेला तसे तसे मी सर्पोद्यानचा होऊन गेलो.साप कसे काय मला ओळखायला लागले मी त्यांना पकडायला कसा शिकलो मला पण माहित नाही.जगातल्या सर्वोत्तम लोकांच्या बरोबर काम केल्यामुळे सगळं जमून गेलं.त्यादिवासामध्ये मी घरी फक्त ४०% सांगायचो ."सुसरीच्या pit मध्ये उतरून साफ करायचो!" अशा गोष्टी सांगितल्या असत्या तर आईला वेड लागले असते...तिकडचे लोक करू शकतात तर मी पण करू शकतो एवढंच विचार करून मी काम करायचो.कधी कधी विचार न करता पण पण अवघड कामे करायचो नंतर वाटायचे की विचार केला असता तर हे काम नसतो करू शकलो.("सोचुंगा तो करूंगा कैसे!").त्याच काळामध्ये मी राजाभाऊ बरोबर पुण्यामध्ये लोकांच्या घरात आलेले साप पकडायला जायचो.बाबा (पटवर्धन )बरोबर लोकांचे कॉल करायचो .(कॉल मध्ये विषारी,बिनविषारी साप,घोरपड,घर,घुबड असे अनेक काही ...)रोज वेगळीच excitement असायची .

नंतर college चालू झाल्या पासून मला एकट्याला कॉल यायला लागले .(मित्र मला कॉल बॉय म्हणायचे !)माझी सापाची पिशवी आणि स्टिक तयार असायची. कॉल आल्यावर कमीत कमी वेळे मध्ये पत्ता विचारून तिथे पोचणे स्किल असायचे .त्यातून पुण्यात पत्ता विचाराने म्हणजे लोकांचे १०० प्रश्न्न !असे करून त्या जागी पोचणे लोकांचा अंदाज घेणे,साप कुठे आहे ,जातीचा अंदाज आणि मग शेवटचे म्हणजे पकडून त्याला पिशवी मध्ये टाकायचा.मग चालू व्हायचे लोकांचे असंख्य प्रश्न . यासगळ्या कॉल मधले साप पकडणे फक्त जास्तीतजास्त ५ मिनटे चालायचे .लोकांना सांभाळणे कठीण काम असायचे.
सुरवातीला हे सगळं मी नवीन अनुभव म्हणून बघायला लागलो.पण हळू हळू "लोकांमध्ये साप पकडणे हे खूप जवाबदारी चे काम आहे हे मला कळले .हे सर्पोद्यानचे काम घरचे कार्य असल्यासारखे करायला लागलो.बाबाना तर वाटायचे की पोरगा गेलं हाताबाहेर ! पण काही दिवसातच त्यांना "सापवाल्याचे आईबाबा " असे ओळखायला लागल्यामुळे नंतर त्यांनी कधी मला अडवले नाही ."लोकांचा विश्वास आणि साप वाचवणे" या गोष्टी मी गारुडी बनून मिळवल्या.
मित्रांमध्ये मी गारुडी म्हणूनच ओळखला जातो .मला खूप बरे वाटते की या गारुड्याचा जन्म झाला त्यामुळे काही प्रमाणात तरी पुण्यातले साप वाचले !
(फक्त मी साप का पकडायला लागलो हेच मला लिहायचे होते..अजून या वरचे खूप लेख पुढे येणार आहेत...;) ...)
(Courtesy to gettyimages.com)

माझी ब्राझीलची मैत्रीण...




(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


खूप दिवसा पासून हा विषय होता डोक्यात पण लिहिण्यासाठी वेळच होत नव्हता.मी तसा लोकात मिसळणारा मुलगा आहे त्यामुळे मित्र मैत्रिणी भरपूर .एकडे पण आल्यावर अंतरराष्ट्रीय मुला मुलींशी माझी मैत्री लगेच झाली.आज जिच्या बद्दल सांगणार आहे ती मैत्रीण माझी भारतात असताना अनपेक्षित पणे झाली...."कार्ला" माझी ब्राझीलीअन मैत्रीण.

एका मित्राच्या द्वारे तिने माझ्याशी orkut वर संपर्क केला.तिला तेव्हां भारतीय संस्कृती बद्दल माहिती पाहिजे होती.पण मुख्य अडचण होती भाषेची...कारण तिला पोर्तुगीज यायचे आणि इंग्लिश चा तिचा बाजार उठला होता.खरं तर मला फार कंटाळा यायचा तिच्याशी बोलताना कारण माझा पुणेरी इंग्लिश आणि तिचे पोर्तुगीज अशी लढाई चालायची.एक दिवस मला google translator चा उपयोग समजला आणि मग आमच्या गप्पा मस्त पैकी व्हायला लागल्या.तिला मी भारतीय इतिहास सांगितला.तिच्या ज्या भारताबद्दल चांगल्या वाईट समजुती होत्या त्या दूर केल्या.तिला सगळं ज्ञान बॉलीवूड चे सिनेमे पाहून आले होते आणि ते पण DDLJ सारखे.हे सगळं मी तिला पोर्तुगीज मधून सांगितले.ही तर सुरवात होती. जेव्हां तिच्या अभ्यासाचे काम झाले तेव्हां आम्ही अवांतर विषयावर बोलायला लागलो."arrange marriage " म्हणजे काय हे मिला १ तास पोर्तुगीज मध्ये समजून सांगितले....;)

२००९ मध्ये मी भारत सोडला आणि माझ्या नवीन जीवनाची सुरवात झाली.सगळच नवीन भाषा,लोक,प्रदेश अशा वेळी मला नाही माहित कसे पण कार्ला मदतीला आली.मी जेव्हां दमून घरी यायचो तेव्हां (ब्राझील २ तास पुढे) तिची झोपायची तयारी चालू असायची मग मी google translator उघडून बसायचो.तासनतास आमच्या गप्पा चालू व्हायच्या.मला एक एक गोष्टी हळू हळू कळत गेल्या.Recife हे ब्राझील चे समुद्राकीनार्यावरचे झकास गाव त्या गावातले लोक पण तसेच झकास आणि कार्ला याचं गावची.५ दिवस काम करायचे आणि २ दिवस मजा, कुठे रडगाणे नाही,किवा Ipad किंवा Lamborghini ची ओढ नाही.तिने मला सांगितले की आमची संस्कृती खूप free आहे त्याचा खूप लोक फायदा घेतात.त्यामुळे ब्राझील म्हणले की कार्निवल आणि सांबा नाच जगाला दिसतो पण खरे ब्राझील वेगळे आहे.त्यांची पण खूप जुनी संस्कृती आहे.कार्लाचे कुटुंब पण pure catholic आहे.मला हळू हळू ब्राझील ची खरी ओळख पटत गेली.कार्ला चा weak point म्हणजे तिची Family (शेवटी सगळ्या मुली सारख्याच;))

एकदा तिने मला विचारले की तुझ्या देशात लोक दोन लग्न करतात का?(Bollywood च्या ना ..)मी म्हणलो "हो"..तिचे उत्तर होते की "तुझ्या आई ला कार्ला दुसरी सून म्हणून चालेल का ?". मी विकेट काढायला गेलो आणि माझीच दांडी उडवली.
मला उमजले की इच्छा असेल तर भाषा, अंतर या गोष्टी आड येत नाही.आता तर मी तिच्या बरोबर बेक्कार गप्पा मारतो.त्यातून मध्ये football चा worldcup आला .तिने मला एक ब्राझील चा t shirt आणि एक teddy bear पाठवला.मी पण क्रिकेट ला support करतो तसं ब्राझील ला फुल जीव लावून support केला.तिने पण क्रिकेट बघायला सुरवात केली . सचिन ची ती बेक्कार fan आहे...माझ्या पुण्याच्या गोष्टी ऐकून तिने मला एकदा विचारले की तू नोकरी का नाही केली शिकत असताना,आमच्या एकडे तसं केले तर त्या मुलाला मुलगी कधीच मिळणार नाही...मी पण शांत झालो कारण आपल्या एकडे नोकरी म्हणजे शिक्षण झाल्या वर असे समीकरण आहे.तिच्या आईशी बोललो तर मला दाते काकूंची आठवण झाली,सेम टू सेम फक्त भाषा वेगळी.त्यांना गोव्याला याचे आहे एकदा तरी आयुष्यात,सेंट झेवियर चर्च त्यांचे धर्मास्तान आहे.अशी २ वर्ष कधी गेली कळल पण नाही ,कार्ला बरोबर माझी wavelength कधी जुळली आणि कशी काय जुळली हे एक कोडे आहे .

मी आणि ती लोकांना कधी पटवून द्यायच्या फंदात पडलो नाही की आमची मैत्री खरी का खोटी कारण काही झाला तरी मी तिला कधी भेटलो नाही आणि ती मला..पण आम्ही दोघांशी प्रामाणिक राहिलो म्हणून निखळ मैत्री झाली.Social Networking site वरून चांगली मैत्री होऊ शकते हे लोकांना कधी पटणार नाही.वेगळी भाषा,वेगळी संस्कृती असून मला तिचा विश्वास टिकवण्यासाठी कधी तडफड करावी लागली नाही यातच सगळे मैत्रीचे गुपित आहे.ती पण आत्ता इंग्लिश,मराठी शिकत आहे आणि मी पोर्तुगीज कारण पुढच्या आयुष्यात एकदा तरी विधात्याने भेट लिहिली आहे..

Thursday, February 3, 2011

त्या टीव्हीला खड्यात घाल !

मला लहानपणी शाळेमध्ये निबंध असायचा "टीव्ही मानवाला शाप का वरदान? " मी आपली नेहमीचे फायदे तोटे लिहायचो की टीव्ही बघितल्याने माहितीत भर पडते ,जगातल्या बातम्या कळतात आणि तोटे म्हणजे डोळे बिघडतात ,लहान मुळे बाहेर खेळत नाही अशी बाळबोध कारणे ( मला अजून आठवते हा माझा निबंध बाईंनी वर्गात वाचून दाखवला होता.)..आत्ता जेंव्हा हे आठवते तेंव्हा मजा वाटते ...आत्ता जाणवते ही पुस्तकातली कारणे आणि खऱ्या आयुष्यातील कारणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे...."जास्त टीव्ही पाहून लग्न मोडते ,संसार उध्वस्त होतात, वजन वाढून जीवघेणे आजार होतात, रक्तदाब वाढतो असे अनेक काही " याचा विचार कधीच केला नव्हता मी.........हा "इडियट बॉक्स "खरच कधी कधी आयुष्याची मंडई करतो......

ही एवढी मोठी प्रस्थावना वाचून आत्ता तुम्हाला वाटले असेल आत्ता पुढे असेच काही तरी भयाण असेल...पण तो गैरसमज काढून टाका...हे गाणं ३ मिनिटात आपल्याला नाचायला लावते आणि पुढे अख्खा दिवस आपण नाचतच राहतो ..... या गाण्याचा "जोश टर्नर" जरा बसक्या आवाजाचा गायक आहे पण तो वेगळेपणाच त्याच्या या गाण्यात जान आणतो... ...खूप कंट्री गाण्यांचे video एकसुरी दिसतात कारण ते कमी बजेट मध्ये बनवलेले असतात....पण हा video बघा एकदम दिल खुश होऊन जाते...




आपल्या घरात रोजच घडणारी गोष्ट.....गृहिणीचे स्वयंपाक घरातील काम संपवून एकता कपूरची रद्दड मालिका बघते आहे किंवा तिचा नवरा "त्याच त्याच" बातम्या आजतक वर बघत आहे....किती कंटाळवाणे दृश्य आहे हे...!

हेच दृश्य जगातल्या बहुतांश घरात थोड्या फार फरकाने दिसत असते.....

तेच दृश्य बदलण्यासाठी तो तिला एवढंच म्हणतो की "हा टीव्ही सोडून माझ्या बरोबर फक्त नाचायला ये....जगाला विसरून फक्त आपण दोघंच नाचत राहू...!"

"आपले घर छोटे आहे किंवा आपल्याला कोणी बघते आहे का याची चिंता सोडून दे आणि फक्त माझ्या मिठीत ये..."Baby Why Don't We Just Dance"
"बिलकुल लाजू नकोस( "सगळ्याच मुलींना थोडा भाव द्यावा लागतो..;))....माझ्या साठी तू अप्सरा आहेस ..तू जशी आहेस तशी मला खूप आवडते.....मी तुझ्यासाठी वेडा झालो आहे...काही ना विचार करता आपण रात्र भर नाचत राहू...."so Why Don't We Just Dance."

गाणं खूप छोटे आहे ....तसेच ते खूप साधे आणि सोपे आहे...याचं गाण्याप्रमाणे आपण असेच "साधे सोपे" वागलो तर आपले आयुष्य पण खरच खूप सुंदर होऊन जाईल........"
"so baby Why Don't We Just Dance !"