Saturday, February 12, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग...!



"FACEBOOK" हे या मागच्या काही वर्षातले व्यसन ....पण आत्ता तो धारावी पासून time square पर्यंत सगळी कडे पसरले ....मी पण त्याची शिकार झालो.... २००९ चालू झाले तेंव्हा मला कोणी सांगितले असते की "फेसबुक भारी आहे" तेंव्हा मी त्याला वेड्यात (सभ्य शब्द !)काढले असते...

त्याकाळी ऑर्कुट जिवंत होते पण मी त्याची शिकार वैगैरे झालो नव्हतो...एकडे Cookeville ला आलो तेंव्हा पासून ऑर्कुट मृत्यू शय्ये वरती होते..आणि थोड्या दिवसात ते वारले ...आणि मग माझ्या फेसबुक वरती एकावेळी असे ४० लोक वगैरे online दिसायला लागली..माझा फेसबुक वेड येथून चालू झाले....जे काही सुचेल ते status मध्ये टाकायचे ,नवीन फोटो काढला ,गाणं ऐकले की टाक फेसबुक वर असे चालू झाले...त्यातूनच भन्नाट अश्या काही status मेसेज चा जन्म झाला...याच प्रत्येक मेसेज ची एक वेगळी कहाणी आहे...

भारत सोडताना २ वेळचे फुल तूपभात जेवण आणि संध्याकाळी पोहे,सांजा अश्या वाईट सवयी लागलेल्या त्याच घेऊन मी एकडे आलो...येथे तर मला कोणी हे सगळं देणे शक्य नव्हते ..स्वतःला जगवण्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून अंडी खायला चालू केली... मग काय सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचे खाणे..यात सगळ्या मध्ये अंड्याने एंट्री मारली....

म्हणूनच मी म्हणतो "माझ्यासठी अंड हेच पूर्णब्रह्म !"..

याच अंड्याची आम्लेट बनवत होतो...पण ते खूप वेळा मला उलटवता न आल्यामुळे त्याची भुर्जी व्हायची ...असच करता करता मी "आम्लेट उडवायला शिकलो!"

एक दिवस दुपारी गौतम-निवेदिताने घरी जेवायला बोलावले आणि त्या "गरम पोळ्या आणि वांग्याचे भरीत खाऊन मला मोक्ष मिळाला.."!


प्रत्येक सणासुदीच्या दिवशी घरची मला खूप आठवण येते ....दिवाळी आली तर इमोशनल अत्त्याचार होतो.सगळं लहानपण आठवते त्यातून मग हा मेसेज आला.

."चकलीच्या भाजणीचा वास ,मातीचा अळीव पेरलेला किल्ला ,कंदीलातून झिरपणारा केशरी प्रकाश,रस्त्यावरचा फटक्याचा धूर ,kingcong छाप सुतळी बॉम्ब "...या गोष्टी online मिळतात का कुठे ...

स्वदेसचे "ये जो देश हे मेरा "२६ जानेवारी ला ऐकत होतो...आणि एकदम मला माझी शाळा आठवली...

"न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान...खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शुभ्र शर्ट....खिश्यावर तिरंगा पुढे चितळे उभा आणि मागे बिडकर ... "सावधान !" ...पाटील सर घुमटावर ध्वजारोहण करत आहेत......जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य-विधाता.".....
हा मेसेज माझ्या अनेक शाळा मित्रांना माझ्या बरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळेत घेऊन गेला...


असे म्हणतात की "पुणे" आह शब्द कशाशी पण जोडला गेला की ते प्रसिद्ध होतो...मी तर पक्का पुणेकर त्यामुळे पुण्यावर लिहिणे हा माझा जन्म सिद्ध हक्क...!

"पुणेकराबरोबर वाद घातल्यास पुढचा जन्म पुण्यात आणि तो पण सदाशिवपेठे मध्ये मिळेल !!!"..या मेसेज बद्दल कोणाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही....
सदाशिव पेठेची कीर्ती इस्कीमो लोकांपर्यंत नक्की पोचली असेल....

MTV चा रोडीज हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम...त्याची सुरवातीची निवड फेरी मी बघत होतो ...तो रघू आणि राजीव शिव्या सोडून काही बोलतच नव्हते.. त..म्हणून मला वाटले...

"रोडीचे ऑडिशन घेण्याच्या आधी रघु आणि राजीव ला सदाशिवपेठेच्या दुकानामध्ये दुपारी १ ते ४ मध्ये पाठवायला पाहिजे म्हणजे त्यांना शिव्या न देता लोकांचा अपमान कसा करायचा ते तरी कळेल..." मला खात्री आहे की असे शिक्षण घेऊन आले तर पुढच्या निवड फेरी मध्ये त्यांना शिव्यांची कुबडी वापरावी लागणार नाही....

मला पुण्याची बेक्कार आठवण येते नेहमी...लोकांच्या मनात स्वप्नसुंदरी वगैरे येत असतील माझ्या स्वप्नात पुण्यातले रस्ते,गल्ल्या ,पण टपऱ्या ,अमृतुल्य येतात...मी २ वर्ष झाली घरी गेलो नाही म्हणून मला गौरी विचारात होती की तू होम सिक वगैरे होत नाही का....तर माझा उत्तर होते...

"आय नेवर गेट होमसिक बट आय म आल्वेज गेट पुनेसिक....."(I never get homesick but I am always get Punesick ")

हे असेच काही माझ्या मनात येईल तसे लहित असतो...अजून खूप काही बाकी आहे...पुढच्या भागात अजून विषय आणि मेसेज लिहीन....ही न संपणारी कथा तुम्हाला नक्की आवडेल...

1 comment: